AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहन सुस्थितीत असल्याशिवाय रस्त्यावर आणू नका, कल्याण वाहतूक पोलिसांचं आवाहन

कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यात भर म्हणजे रस्त्यावर बसेस बंद पडत असल्याने नागरीक आणि वाहतूक पोलीस (Kalyan Traffic police) हैराण झाले आहेत.

वाहन सुस्थितीत असल्याशिवाय रस्त्यावर आणू नका, कल्याण वाहतूक पोलिसांचं आवाहन
| Updated on: Dec 02, 2020 | 7:28 PM
Share

ठाणे : कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यात भर म्हणजे रस्त्यावर बसेस बंद पडत असल्याने नागरीक आणि वाहतूक पोलीस (Kalyan Traffic police) हैराण झाले आहेत. ना दुरुस्त बसगाड्या रस्त्यावर चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केडीएमटी, एनएमटी आणि राज्य परिवहन महामंडळास केले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्ते विकास आणि पूल बांधणीची कामे सुरु आहे. कल्याण शीळ फाटा रस्ता, कल्याण वालधूनी, कल्याण-मुरबाड, कल्याण भिवंडी याठिकाणी विकास कामे सुरु आहेत. नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यात भर म्हणजे काही खाजगी आणि सरकारी बस गाड्या रस्त्यात बंद पडत्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.

कल्याणमध्ये आज सकाळपासून तीन बस बंद पड्ल्याच्या घटना घडल्या. एक खाजगी बस कल्याण वालधूनी पूलावर बंद पडली. दुसरी एनएमटीची बस कल्याण पत्री पूलाजवळ बंद पडली. संध्याकाळी केडीएमटीची बस कल्याण मुरबाड रोडवर बंद पडल्याने नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. कल्याण मुरबाड रोडवर बंद पडलेल्या बसमधून धूर निघत असल्याने प्रवासी घाबरले होते.

“खाजगी आणि सरकारी वाहन चालकांनी कोणतेही वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी ते सुस्थितीत आहे की नाही याची शहानिशा केल्याशिवाय ते रस्त्यावर आणू नये. वाहन रस्त्यात बंद पडल्यास वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांसह प्रवासी, नागरीक आणि पोलिसांना होतो. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची बस रस्त्यात बंद पडल्यास त्याचा त्रास होतो. गाड्या दुरुस्त पाहिजेत ही जवाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा डेपो चालक जबाबदार आहे. आज एका दिवसात तीन ठिकाणी बस बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत”, अशी माहिती कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेचे (Kalyan Traffic police) पोलीस अधिकारी सुखदेव पाटील यांनी दिली.

हेही वाचा : ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहीत, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....