AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकात भीषण बस अपघात, 25 जणांचा मृत्यू

बंगळुरु (कर्नाटक): कर्नाटकात कालव्यात बस कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कर्नाटकमधील पांडवपुरा तालुक्यातील कनागमराडी येथे ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून युद्घ पातळीवर मदतकार्य सुरु आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने हा अपघात […]

कर्नाटकात भीषण बस अपघात, 25 जणांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

बंगळुरु (कर्नाटक): कर्नाटकात कालव्यात बस कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कर्नाटकमधील पांडवपुरा तालुक्यातील कनागमराडी येथे ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून युद्घ पातळीवर मदतकार्य सुरु आहे.

बस चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. या अपघाताची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

अपघातग्रस्त बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असल्याचं समजतंय. शनिवारी शाळेचा अर्धा दिवस आटोपल्यानंतर मुलांना सोडत असताना, कनागमराडी इथे एका कालव्यात बस कोसळली. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या बस अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं. त्यानंतर स्वत:ही घटनास्थळाकडे रवाना झाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.