कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यासाठी काळ ठरणारे हे ब्लॅक स्पॉट पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी हटवले जातील अशी (Kolhapur accident death) अपेक्षा वाहनधारकांना आहे.

कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 05, 2020 | 11:43 PM

कोल्हापूर : वाढते रस्ते अपघात हा दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं (Kolhapur accident death) आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 340 जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. तर तितकेच लोक जखमीही झाले आहेत. त्यामुळं कोल्हापूरचे रस्ते प्रवाशांसाठी काळ ठरताहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघातांच्या आकडेवारीची दखल आता खुद्द पालकमंत्र्यांनीच घेतली आहे.

राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा शहरातील रस्ते, प्रत्येकाला कमी वेळेत आपल्या इच्छित स्थळी पोहचायची घाई असते. त्यातच दळणावळच्या सोयीसाठी बनवलेले चकचकीत रस्ते आणि आटोमॅटिक वाहनांमुळे रस्ते अपघाताच प्रमाण देखील वाढतं आहे. पण अनेक वेळा रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी न घेतल्यानं देखील तितकेच अपघात वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकाच ठिकाणी वारंवार अपघात होणारे 84 ब्लॅक स्पॉट आहेत. ज्या ठिकाणी वर्षभरात 340 जणांचा मृत्यू झाला (Kolhapur accident death) आहे.

या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 340 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर शहरात दोनपेक्षा अधिक वेळा अपघात झालेली 29 ठिकाण आहेत. तर जिल्ह्यातील राज्यमार्गावर तब्बल 29 ब्लॅक स्पॉट आहेत. पुणे बँगलोर महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 89 ब्लॅक स्पॉट असल्याची धक्कादायक माहितीही यानिमित्ताने उघड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अधोरेखित केलेल्या ही अपघातांची ठिकाण आणि मृतांची आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे आता खुद्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ब्लॅक स्पॉटची दखल घेतली आहे. पोलीस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित विभागांना त्यांनी चार महिन्यात या ब्लॅक स्पॉटबाबत प्रभावी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरं तर सुरक्षित प्रवास हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न प्रशासनाच्या पातळीवर केले जात नाही. म्हणूनच अनेक प्रवाशांचे दररोज जीव जात आहेत. किमान कोल्हापूर जिल्ह्यासाठी काळ ठरणारे हे ब्लॅक स्पॉट पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी हटवले जातील अशी (Kolhapur accident death) अपेक्षा वाहनधारकांना आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.