…तर देशभरात ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू सेनेचा इशारा

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay kumar) लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

...तर देशभरात 'लक्ष्मी बॉम्ब' प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू सेनेचा इशारा
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीमध्ये या सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अक्षयचा हा सिनेमा साउथच्या 'कंचना'चा रिमेक आहे.
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 10:20 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay kumar) लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब सिनेमातील कलाकार, डायरेक्टर यांच्या विरोधात माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सिनेमाला विरोध दर्शविला आहे. या सिनेमातून देवीचा अपमान करण्याबरोबरच लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याने आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा सिनेमा देशात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा हिंदू सेनेने दिला आहे.(Lakshmi Bomb’ will not be allowed to be displayed; Hint of Hindu Sena)

राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा सिनेमा देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या सिनेमातून ‘लव्ह-जिहाद’ला उत्तेजन दिले जात, असल्याचा दावाही हिंदू सेनेने केला आहे. जोपर्यंत आम्ही सांगितलेले बदल होणार नाहीत, तोपर्यंत देशामध्ये कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दिला आहे.

दरम्यान, या सिनेमात अक्षयने असिफ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर कियारा अडवाणी पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारत आहे. या सिनेमात असिफचे पूजावर प्रेम दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा नेटकऱ्यांचा समज झाला असून त्यामुळे त्यांनी या सिनेमासह अक्षयलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून माता लक्ष्मीच्या नावाचा गैरवापर करून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ची कथा काय?

‘लक्ष्मी बॉम्ब’मधील हा नायक भुतांवर विश्वास न ठेवणारा आहे. भारतात तो त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला भेटायला आला आहे. इथे लोकांची भुतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भुतं नसतात. भुतं असतील तर मला दिसतील तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा हा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागतात. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेले घरातील लोक अनेक उपाय करतात. सिनेमात पुढे आणखी काय काय घडते हे तुम्ही प्रत्यक्ष सिनेमाच पाहिल्यावर कळेल.

संवंधित बातम्या : 

अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर नेटकऱ्यांचा टीकेचा बॉम्ब

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

(Lakshmi Bomb’ will not be allowed to be displayed; Hint of Hindu Sena)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.