AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा, गारासंह पावसाचा अंदाज

राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा,  गारासंह पावसाचा अंदाज
weather
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 31, 2022 | 11:58 AM
Share

पुणे : राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. त,र काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी

पुणे वेधशाळेकडून राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रासह औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

48 तास थंडी कायम राहणार

रविवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, कर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्रान व्यक्त केला आहे.

मुंबईत धूरकट वातावरण

मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. तर काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं.

इतर बातम्या:

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

Gadchiroli Nagar Panchayat | एटापल्ली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?, दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra weather forecast IMD Predicted cold wave in nine district of North Maharashtra and Marathwada region

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली