AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर आता परप्रांतिय नागरिक पुन्हा पुण्यात येऊ लागले आहेत. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधून 5 हजार 700 प्रवासी पुण्यात आलेत (Bihar Migrant labour returning to Pune)

पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 08, 2020 | 7:04 PM
Share

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर आता परप्रांतिय नागरिक पुन्हा पुण्यात येऊ लागले आहेत. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधून 5 हजार 700 प्रवासी पुण्यात आलेत (Bihar Migrant labour returning to Pune). बिहारमधून साधारण 2 हजार प्रवासी पुण्यात आले आहेत. 5 जूनला बिहारमधून पुण्यात पहिल्या ट्रेनचं आगमन झालं. गेल्या 4 दिवसांपासून बिहारमधून परप्रांतीय नागरिक येत आहेत. यातील अनेक जण परप्रांतीय मजूर आहेत.

मध्यंतरीच्या काळात परप्रांतीय मजुरांच्या मुद्द्यावरुन राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानं अनेक उद्योगधंदे सुरु झाले आहेत. त्यामुळे गावी गेलेले मजूर पुन्हा पुण्यात येत असल्याचे दिसतं आहे. बिहारमधून सकाळी साडेपाच वाजता ट्रेन पुण्यात दाखल होते. या ट्रेनमधून रोज साधारण 400 परप्रांतिय पुण्यात येतात. बिहारमधून पहिल्या दिवशी 586, दुसऱ्या दिवशी 476, तिसऱ्या दिवशी (7 जून) 385 आणि चौथ्या दिवशी (8 जून) 316 प्रवासी पुण्यात आले.

पुण्यातून बिहारसाठी दानापूर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. तर मुंबईतून पुणे मार्गे गदग एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या धावतात. या रेल्वे 1 जूनपासून धावत आहेत. पुण्यात आलेल्या परप्रांतीय नागरिकांची रेल्वे स्थानकावर वैद्यकीय तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथकं आणि महसूल पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे. फ्लू सदृश्य लक्षणं आढळल्यास प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर संबंधितांना 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात येत आहेत. या सर्व प्रवाशांना पीएमपीएलच्या बसमधून घरी पोहोचवलं जात आहे.

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले

दरम्यान, लॉकडाऊनमधील शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत असल्याचं चित्र आहे. (migrant workers returning Mumbai) कारण अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेंमधून अंदाजे 20 हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत. कोरोना संकटामुळे लॉकडाऊनदरम्यान परप्रांतिय मजूर आपआपल्या गावी गेले होते. मात्र हळूहळू ते पुन्हा परतू लागल्याचं चित्र आहे.

वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 01094 क्रमांकाची रेल्वे काल 7 जूनला मुंबईत निर्धारित वेळेत पोहोचली. या रेल्वेने 594 प्रवासी मुंबईत आले. यापैकी 163 कल्याण, 198 ठाणे, 210 दादर आणि 23 प्रवासी सीएसएमटीवर उतरले. या स्थानकांवर संबंधित मनपा, जसे कल्याण डोंबिवली, ठाणे आणि बीएमसीने सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करुन, होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.

3 जून ते 7 जून या चार दिवसात जवळपास 20 प्रवासी रेल्वेने मुंबई आणि उपनगरात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने आतापर्यंत 60 गाड्या सोडल्या. या विशेष रेल्वेमधून जवळपास 20 हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले. तर पुण्यात तीन रेल्वे दाखल झाल्या असून, तिथे 1200 प्रवासी उतरले.

संबंधित बातम्या :

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?

त्र्यंबकेश्वरमध्ये कंत्राटी कामगारांचं स्वत:ला कमरेपर्यंत गाडून घेत आंदोलन

Bihar Migrant labour returning to Pune

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ