AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाइटच्या डीपीसाठी औरंगाबादेत फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

गेल्या काही दिवसांपासून फुलंब्री येथील लाइटची डीपी बंद आहे. ती सुरु करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी केली. मात्र तरीही त्यात दुरुस्ती झाली नसल्याने फुलंब्री येथील शेतकरी आक्रमक झाले.

लाइटच्या डीपीसाठी औरंगाबादेत फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण
डीपी दुरुस्त न केल्यामुळे शेतकऱ्याची महावितरणच्या उप अभियंत्याला मारहाण
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 2:21 PM
Share

औरंगाबादः काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार घडला होता. आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही कृती केली.

महावितरणच्या उपअभियंत्याला मारहाण

गेल्या काही दिवसांपासून फुलंब्री येथील लाइटची डीपी बंद आहे. ती सुरु करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी केली. मात्र तरीही त्यात दुरुस्ती झाली नसल्याने फुलंब्री येथील शेतकरी आक्रमक झाले. यातील मंगेश साबळे नावाच्या तरुणाने उप अभियंत्याला मारहाण केली. सदर प्रकारानंतर डीपी दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

काल गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभियंत्याला कोंडले

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही काल याच कारणासाठी आंदोलन केले. येथील शेतकऱ्यांनीदेखील आक्रमक होत उप अभियंत्याशी बाचाबाची केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला केबिनमध्ये कोंडून ठेवले आणि केबिनला टाळे लावले होते.

इतर बातम्या-

POCSO कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचारासाठी ‘स्किन-टू-स्किन’ स्पर्श आवश्यक नाही- सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा वादग्रस्त आदेश फेटाळला

MPSC च्या राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण 416 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देणार, दत्तात्रय भरणेंची माहिती

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.