AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही? तब्लिगीवरुन पवारांचा सवाल

गर्दी टाळूया, अंतर राखूया," असेही आवाहन शरद पवारांनी सर्व जनतेला (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) केलं. 

जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही? तब्लिगीवरुन पवारांचा सवाल
| Updated on: Apr 06, 2020 | 12:20 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या काळात काळजी घ्या,” असे आवाहन शरद पवार यानी यावेळी केले. तसेच त्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणच्या कार्यक्रमावरही भाष्य केले.

“डॉक्टर, नर्स हे कष्टाने काळजी घेत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी घरी (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) बसायला पाहिजे. सर्व जात- धर्मांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.

“दिल्लीत निजामुद्दीन जवळ जे संमलेन झालं खरतरं अशा परिस्थिती हे संमलेन घ्यायला नको होतं. त्या संमलेनाला ज्यांनी परवानगी दिली होती, त्याची अजिबात परवानगी देण्याची गरज नव्हती,” असे शरद पवार म्हणाले.

“महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे संमलेनाची विनंती धार्मिक संघटनांनी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री यांनी विचार करुन ही परवानगी नाकारली. म्हणून ती खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं,” असेही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

“सोलापुरात बैल घोडा शर्यती करण्याची गरज नव्हती मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर प्रशासनाचे कौतुक केले. दिल्लीतील संमेलनाविषयी वारंवार टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.

“कोरोनाबाबत मी जे काही टीव्हीवर बघतो. त्यापेक्षा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरचे मॅसेज काळजी करण्यासारखे आहेत. त्यातील 5 पैकी 4 मॅसेज हे खोटे असतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे,” असे आवाहन शरद पवारांनी केले.

“येत्या काळात रोजगार कमी होण्याची शक्यता आहे. या संकटाला कसं तोंड द्यावं, यावर जाणकारांनी विचार करायला हवा,” असेही शरद पवार म्हणाले.

“केंद्राने राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे, शेती संदर्भात मदत करण्याची गरज, रबी हंगाम संपत आला आहे, पीके वेळीच काढली नाहीत तर मोठं नुकसान होईल. त्यामुळे सर्व राज्यांना सर्व भाषेत टीव्ही आणि अन्य माध्यमातून केंद्राच्या कृषी विभागाने मार्ग दाखवावा,” असेही आवाहन शरद पवारांनी केले.

“यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा. महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया,” असेही आवाहन शरद पवारांनी सर्व जनतेला (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) केलं.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला