AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची मुसंडी, इतरांच काय झालं वाचा सविस्तर…

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. जवळपास ४१ जागांवर राष्ट्रवादीने विजय खेचून आणला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची मुसंडी, इतरांच काय झालं वाचा सविस्तर...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 19, 2022 | 7:31 PM
Share

नाशिक : आज संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchyat Election) निकाल समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारत 41 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या (NCP) विजयाचाच डंका आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, दिंडोरी, कळवण तालुक्यातील आकडेवारी बघता यामध्ये राष्ट्रवादी 41, शिवसेना 13, भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागा आलेल्या आहेत. यानुसार राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे. याशिवाय स्वराज्य संघटनेने देखील पहिला विजय नाशिकमधून मिळवला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाल पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. जवळपास 41 जागांवर राष्ट्रवादीने विजय खेचून आणला आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थपन झाल्यानंतर त्यांचीच हवा पाहायला मिळत होती. मात्र राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने मिळवलेला विजय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. रविवारी मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी सुरू होती.

जिल्ह्यातील नाशिक तालुका, दिंडोरी, कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यात राष्ट्रवादी 41, शिवसेना 13, भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागांचा निकाल आला आहे.

राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे असून शिंदे गटाच्या ताब्यात एक ग्रामपंचायत आली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं देखील विजय मिळवला असून संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत.

स्वराज्य संघटनेला महाराष्ट्रातून पहिला विजय हा नाशिक मधील गणेश गावातून मिळाला आहे. येथील रूपाली ठमके यांनी सरपंच म्हणून विजय मिळवला आहे.

दरम्यान, नाशिक निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.