AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक

चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेनेही चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) प्रक्षेपणाचे कौतुक केलेले आहे.

चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक
| Edited By: | Updated on: Jul 28, 2019 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली : चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेनेही चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) प्रक्षेपणाचे कौतुक केलेले आहे. पाकिस्तानच्या लाहोरमधील एक युट्यूबर (Youtuber) साना अमजदच्या एका व्हिडीओमध्ये चंद्रयान 2 वर पाकिस्तानी जनतेने आपलले मत मांडले आहे. यामध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाने पाकिस्तानने भारताकडून शिकण्याची गरज आहे, असं वक्तव्य केलेलं दिसत आहे.

युट्यूबर साना अमजदच्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणाला, “भारताने चांगले पाऊल उचललं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारत नेहमी पुढे असतो. पाकिस्तानने यामधून शिकणे गरजेचे आहे”.

“भारताच्या या कामगिरीचे आम्ही कौतुक करतो. आपल्याला भारताकडून शिकले पाहिजे”, असंही या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणाला.

दरम्यान, काही लोकांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच भारताच्या प्रगतीमधून पाकिस्तानच्या तरुणांनी खूप काही शिकणे गरजेचे आहे. त्यासाठी देशाने आणि तरुणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात गुतंवणूक करणेही गरजेचे आहे, असंही या व्हिडीओमध्ये अन्य एक व्यक्ती म्हणाला.

पाकिस्तानशिवाय अमेरिका आणि जर्मनीसह इतर देशातील राजदुतांनीही भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताने 22 जुलै रोजी चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण केले. चंद्रयान 2 निर्धारित कार्यक्रमानुसार 20 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.