AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट

कंगनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कंगणाविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नाशिक पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट
छगन भुजबळ
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 17, 2021 | 1:05 PM
Share

मुंबईः कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरूंचेही योगदान आहे. त्यामुळे इतिहास बदलण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कंगनाच्या वक्तव्याची नोंद घेण्याचीच गरज नाही, असे खणखणीत उत्तर बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ते मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते. यावेळी भुजबळांनी भाजपचाही समाचार घेतला. कंगना राणावतने ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असे वक्तव्य केल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. कंगनाचे अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कंगनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कंगणाविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांना सर्व पुरावेही दिले आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या कंगनाला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान असल्याची जहरी टीका केली होती. त्यानंतर आज बुधवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले. त्यांनी कंगनासह भाजपलाही इशारा दिला.

भाजपकडून पोळी भाजणे सुरू

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची नोंद घेण्याची गरज नाही. आपल्या देशात कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरुंचे ही योगदान आहे. कंगना आणि गोखलेंच्या वक्तव्यावर समाज माध्यमातून देखील टीका झाली. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अशा इशारा यावेळी भुजबळांनी दिला. हिंदुत्वाचा वाद निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. महागाई आणि इतर सर्व मुद्दे बाजूला पडले आहेत आणि हिंदू-मुस्लिम विषय चर्चिला जातो आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची नोंद घेण्याची गरज नाही. आपल्या देशात कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरुंचे ही योगदान आहे. कंगना आणि गोखलेंच्या वक्तव्यावर समाज माध्यमातून देखील टीका झाली. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. – छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून, भागवतही म्हणालेले आमचा DNA एक, खासदार सावंतांकडून उजाळा

Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?