पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमा आणि भारतीय जाहिरातींवर बंदी

इस्लामाबाद : माणूस रागाच्या भरात काहीही करुन बसतो, पण त्याचा तोटा कुणाला होतो याचं भान रागात राहत नाही. तसंच काहीसं पाकिस्तानच्या बाबतीत झालंय. कारण, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय सिनेमे आणि भारतीय जाहिरातींवर बंदी घातली आहे. पण याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारतीय सिनेमा दाखवल्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधींचा महसूल मिळत होता, तर जाहिरातींमुळे तेथील […]

पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमा आणि भारतीय जाहिरातींवर बंदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

इस्लामाबाद : माणूस रागाच्या भरात काहीही करुन बसतो, पण त्याचा तोटा कुणाला होतो याचं भान रागात राहत नाही. तसंच काहीसं पाकिस्तानच्या बाबतीत झालंय. कारण, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय सिनेमे आणि भारतीय जाहिरातींवर बंदी घातली आहे. पण याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारतीय सिनेमा दाखवल्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधींचा महसूल मिळत होता, तर जाहिरातींमुळे तेथील वाहिन्यांना पैसे मिळत होते. आता पाकिस्तानच्या या निर्णयावर त्यांची जनता किती समाधानी आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर आपल्याच सीमेत येऊन आपल्यावरच हल्ला केल्याने पाकिस्तान चिडलाय. त्यामुळे पाकिस्तानने भारतीय सिनेमांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी याबाबत माहिती दिली. शिवाय भारतात निर्मित झालेल्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात यावी, अशा सूचना पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅटरी अथॉरिटीला (पीईएमआरए) देण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले.

खरं तर पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताला काहीही फटका बसणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार अत्यंत कमी आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने तिथे विकण्याचा फार तोटा भारताला नाही. म्हणूनच जाहिरातींवर बंदी घातली तरी भारतीय उत्पादनांना आणि भारतीय जाहिरात व्यवसायाला तोटा होणार नाही असा अंदाज लावला जातोय.

दुसरं म्हणजे पाकिस्तानने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यची ही पहिलीच वेळ नाही. अनेक भारतीय सिनेमांमुळे पाकिस्तानच्या भावना दुखावतात आणि ते या भारतीय सिनेमाचं प्रदर्शन होऊ देत नाहीत. यामध्ये पाकिस्तानमधील ज्या प्रेक्षकांना भारतीय सिनेमा आवडतो, त्यांचीच नाराजी पाक सरकारला ओढवून घ्यावी लागते. यावेळीही पाकिस्तान सरकारने तेच काम केलंय.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकचा एमएफएन दर्जा रद्द

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच एमएफएन दर्जा काढून घेतला. शिवाय पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी वाढवली. त्यामुळे पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय. शिवाय भारताकडून जाणाऱ्या वस्तूही बंद झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये टोमॅटो, आद्रक यांचे दर गगनाला भिडले आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.