AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar mob lynching | गडचिंचले झुंडबळी पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा कोर्टात जाताना अपघाती मृत्यू

पालघरमधील गडचिंचले झुंडबळीत मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू मांडणाऱ्या मुख्य वकिलाच्या सहयोगी वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Palghar mob lynching | गडचिंचले झुंडबळी पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा कोर्टात जाताना अपघाती मृत्यू
| Updated on: May 15, 2020 | 12:19 PM
Share

Palghar mob lynching पालघर : गडचिंचले झुंडबळीत मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू मांडणाऱ्या मुख्य वकिलाच्या सहयोगी वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिग्विजय त्रिवेदी (Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident ) असं या वकिलाचं नाव आहे. दिग्विजय त्रिवेदी हे बुधवारी सकाळी भाईंदरवरुन स्वत:च्या कारने डहाणू न्यायालयात जात होते. त्यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवणच्या खिंडीत त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेली महिला सहकारी गंभीर जखमी झाली आहे. (Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident )

गेल्या महिन्यात पालघरमधील गडचिंचले या गावात मोठ्या समुहाने संशयावरुन तिघांना बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केली होती. यामध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावातील शेकडो नागरिकांना अटक करण्यात आली आहे. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसापूर्वी या भागात जाऊन माहिती घेतली होती. देशभर हे प्रकरण गाजलं होतं.

याप्रकरणी मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू दिग्जिवज त्रिवेदी मांडत होते. विश्व हिंदू परिषदेने पालघरमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणाचं वकीलपत्र त्रिवेदी यांना दिलं होतं. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ते कोर्टाकडे जात होते. त्यावेळी कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. या जबर अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर सोबतची सहकारी जखमी झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे पालघर झुंडबळी प्रकरण? (What is Palghar mob lynching case)

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी 16 एप्रिलच्या रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

वाचा :  पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

(Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident )

संबंधित बातम्या 

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा 

गडचिंचले भाजपचा गड, 10 वर्षांपासून त्यांचा सरपंच, अटकेतील बहुसंख्य भाजपचेच : काँग्रेस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.