AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधी जग नियम बनवायचं, आपण पाळायचो; आता आपण नियम बनवतो’

नवी दिल्ली : आधी जग नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. मात्र, आता आपणच नियम बनवत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी ‘टीव्ही 9′ ग्रुपचे प्रमुख रवीप्रकाश हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही […]

‘आधी जग नियम बनवायचं, आपण पाळायचो; आता आपण नियम बनवतो’
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

नवी दिल्ली : आधी जग नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. मात्र, आता आपणच नियम बनवत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी ‘टीव्ही 9′ ग्रुपचे प्रमुख रवीप्रकाश हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 भारतवर्षला सदिच्छा देतानाच विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच मोदी सरकारच्या अनेक कामांची यादी सांगितली.

टीव्ही 9 भारतवर्षने आपल्या नव्या टीममध्ये भारतभरातील प्रतिनिधींना स्थान दिल्याच्या निर्णयाचे कौतुक करताना मोदींनी आपल्या सरकाच्याही कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘ टीव्ही 9 भारतवर्षचा हा निर्णय प्रशंसनीय आहे. दिल्लीतून चालणाऱ्या गोष्टींमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. मागील 5 वर्षांत आमच्या सरकारनेही अशाच प्रकारे प्रयत्न केले. आम्ही विज्ञान भवन आणि विकास भवनमधून बाहेर पडून राज्यांमध्ये गेलो. याआधी सर्व काही विज्ञान भवनमधून चालायचे.’

जगातील कोणताही राष्ट्राध्यक्ष आला की तो दिल्लीत यायचा. सर्व काही दिल्लीतून चालायचे. आम्ही उज्ज्वला योजना उत्तर प्रदेशमधील बलिया येथून सुरु केली. हँडीक्राफ्ट योजना चेन्नईमधून, आगरामधून आवास योजना, बेटी बचाओ हरियाणामधून सुरु केली. देशातील असं एकही राज्य नसेल जेथे भारत सरकारने महत्वपूर्ण काम केलं नाही. सर्व काही दिल्ली नाही. यामागे एक विचार होता. ज्याप्रकारे सरकारला सीमित करण्यात आले होते, त्याला आता तोडावे लागेल.

आज जग आपल्यासोबत आहे

‘आमच्या सरकारने मागील 5 वर्षात ज्या विचाराने काम केले, ते सर्व देशाने अनुभवले आहे. भारताचे जगातील स्थान आधी किती होते आणि आज कोठे आहे याची तुम्ही तुलना करु शकता. त्यावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होतील. आधी आपण काहीही केले की जगभरातून प्रश्न उत्तरे सुरु व्हायची. जगातील इतर देश नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. आज जगाचे नियम बनवण्यात आपल्या देशाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरण, दहशतवाद, भ्रष्टाचार किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आज स्वरक्षणासाठी सीमेपार जाऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारले. त्यावेळी सर्व जग आपल्या बाजूने उभे राहिले’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी 5 वर्षापूर्वी असे घडत होते का? असाही प्रश्न विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • राष्ट्रहितासाठी जे निर्णय गरजेचे आहेत, ते कुठल्याही दबावाविना घेण्याचं काम मी केलं
  • अंतराळातील कामांसाठी मोठी गुंतवणूक आम्ही केली
  • कन्फ्युजन नव्हे, कमिटमेंटसोबत काम करत आहोत
  • काळ्या पैशाविरोधात एसआयटी बनवण्यासाठी आधीचं सरकार 3 वर्षे टाळत राहिलं, मात्र आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला
  • गेल्या 5 वर्षात आम्ही बँकिंग घोटाळे रोखण्याचे प्रयत्न केले
  • देशात घोटाळा करुन परदेशात पळून जाणाऱ्यांची आज काय स्थिती आहे? हे देश पाहतोय
  • देशात 9 हजार कोटींचा घोटाळा करुन परदेशात पळालेल्याची 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली
  • 8 कोटींची मलाई बंद होईल म्हणून आधारच्या अनिवार्यतेला विरोध सुरु झाला होता
  • विरोधी पक्षांना आणि दिल्लीत एसीत बसलेल्यांना देशातील ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे, हेच माहित नाही
  • भ्रष्टाचारविरोधी लढाई आपण जिंकू शकतो
  • देशात स्वच्छता निर्माण होऊ शकते, यावर देशाला विश्वास बसला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राष्ट्रीय संमेलना’तील संपूर्ण भाषण पाहा :

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या