AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही’, कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना

पुण्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे (Sharad Bhojan yojana).

'पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही',  कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना
| Updated on: Apr 24, 2020 | 11:24 PM
Share

पुणे : लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिक हे पुणे शहरात (Sharad Bhojan yojana) अडकून पडले आहेत. काही नागरिकांची सोय झाली आहे तर काहींचे हाल होत आहेत. पुण्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे (Sharad Bhojan yojana).

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने लॉकडाऊनदरम्यान कुणीही उपाशी राहू नये म्हणून शरद भोजन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून आता दारिद्र्यरेषेखालील आणि इतर व्यक्तींना रेशन पुरवण्याचं काम होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोणीही उपाशी राहाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शरद भोजन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच रुपयात गरजूंना जेवण उपलब्ध करुन देण्यात आलं. तर दुसऱ्या टप्प्यात दिव्यांग नागरिकांना अन्नधान्य देण्यात आलं आहे.

आता शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. यामध्ये एलजीबीटी समूह, धनगर, आदिवासी, पारधी, परराज्यातील अडकलेले मजूर यांच्यापर्यंत हे अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीबरोबरच नगरपालिकेच्या हद्दीतही जिल्हा परिषद ही योजना राबवत आहे.

शरद भोजन योजनेअंतर्गत कोणीही उपाशी पोटी झोपणार याची काळजी घेण्यात येत आहे. तिसऱ्या टप्यात पन्नास हजार लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालाल आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहोचला आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6,817 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आज 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून यात पुण्याचे 5 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आज राज्यातील 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. पुण्यात लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. नियामांचे उल्लंघन करुन गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याशिवाय लॉकडाऊनदरम्यान जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सर्व सुविधा दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.