AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल
| Updated on: Nov 22, 2020 | 9:35 PM
Share

नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

राहुल गांधी यांनी ट्विटरवर अदानी यांची संपत्ती वाढल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून हा सवाल केला आहे. अदानींची संपत्ती वाढली आहे आणि तुमची? असा सवाल त्यांनी केला आहे. या वृत्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014मध्ये सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत गौतम अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली असून अदानी यांच्याकडे 26 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वीही राहुल यांनी अनेकदा मोदी सरकार केवळ काही उद्योगपतींसाठीच काम करत असल्याची टीका केली होती. अदानी ग्रुपने देशातील एकूण 6 विमानतळे ताब्यात घेतली आहेत. त्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. 2 नोव्हेंबर रोजी राहुल यांनी ट्विट करून या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यात त्यांनी विकास तर होत आहे. पण काही उद्योगपती मित्रांचा होत आहे, असा खोचक टोला लगावला होता.

दरम्यान, फेब्रुवारी 2019मध्ये 6 विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं. त्यात लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, बंगळूरू, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी विमानतळांचा समावेश होता. कॉम्पिटिटीव्ह बिडिंग प्रोसेसमध्ये अदानी ग्रुपने या विमानतळांचे हक्क मिळविले होते. त्यानंतर केंद्र सरकार आणि अदानी ग्रुपमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.