AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्येचं सत्र सुरुच आहे. रेल्वे अपघातात गेल्या २१ महिन्यात तब्बल ५०० जणांना मृत्यू झालाय. तर शहरात गेल्या चार दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत.

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 23, 2020 | 9:04 AM
Share

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्यांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघातात गेल्या २१ महिन्यात तब्बल ५०० जणांना मृत्यू झालाय. नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ७९ जणांनी आपले प्राण गमावले. तर रेल्वेतून पडून १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेसमोर आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रेल्वेसमोर उडी मारुन 44 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर १३ जणांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडून मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेली ही माहिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळं नागपूर लोहमार्ग पोलिसांनी हे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. (Railway accident and murder season in Nagpur)

नागपुरात हत्येचं सत्र सुरुच, गृहमंत्री आहेत कुठे?

रेल्वे अपघाताबरोबरच उपराजधानी नागपुरात हत्येचं सत्रही थांबताना दिसत नाही. शहरात गेल्या चार दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. जानेवारी 2020 पासून नागपूर शहरात हत्येच्या तब्बल 77 घटना घडल्या आहेत. तर गेल्या वर्षी नागपुरात 90 जणांची हत्या झाली होती. यामध्ये सर्वाधिक हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील सरकारच्या काळात नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. तरीही नागपुरात दिवसाढवळ्या खून व्हायचे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री विदर्भाचेच असले तरीही नागपुरातील हत्येचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. नागपुरातील गुंडगिरी संपवायची असल्यास गृहमंत्री आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज सर्वसामान्य नागपूरकर व्यक्त करत आहेत.

बहिणीची छेड काढली म्हणून भावाकडून तडीपार गुंडाची हत्या

बहिणीची छेड काढली म्हणून भावानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं एका तडीपार गुंडाची हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. उप्पलवाडीतील विटभट्टी चौकात ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहेत. तर रविवारीच हत्येची दुसरी घटना यशोधरानगर मधील बिनाकी इथं घडली होती. रविवारी रात्री दोन तासांत खुनाच्या दोन घटना घडल्यानं नागपूर हादरलं होतं.

संबंधीत बातम्या:

नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरलं, आरोपी जयंत नाटेकरला अटक

नागपूरमध्ये बलात्कारानंतर चिमुकलीची हत्या, संतप्त नागरिकांची बंदची हाक

Railway accident and murder season in Nagpur

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…