AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातृभूमीचे गतवैभव मिळवून देण्यासाठी सज्ज व्हा; धर्मेंद्र प्रधान यांचं आवाहन

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भद्रक येथे आयोजित 'एकता पदयात्रे'त सहभागी होत सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ओडिशाचे गतवैभव परत मिळवण्याचे आवाहन केले. सरदार पटेल यांच्या एकीकरण कार्याची आठवण करून देत, ओडिशाच्या ऐतिहासिक भूमीचा गौरव केला. या पदयात्रेतून राष्ट्रभक्ती, एकता आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला, जो मुकुंददेव महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून देतो.

मातृभूमीचे गतवैभव मिळवून देण्यासाठी सज्ज व्हा; धर्मेंद्र प्रधान यांचं आवाहन
DHARMENDRA PRADHANImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2025 | 3:43 PM
Share

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आज ओडिशाच्या भद्रक येथे आयोजित भव्य ‘एकता पदयात्रे’मध्ये सहभागी झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत हजारो लोकांनी सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसर फुलून गेला होता. ही एकता यात्रा देशाच्या अखंडतेचं आणि बंधुतेचं प्रदर्शन घडवत होती. सर्वांमध्येच एक उत्साह संचारलेला बघायला मिळत होता.

धामनगरची ही पवित्र भूमी अनेक धर्मप्रचारक, तत्त्वज्ञ आणि महापुरुष यांच्या चरणस्पर्शाने पावन झाली आहे. ही भूमी अखेरच्या हिंदू राजाच्या पराक्रमाचे स्मरण करून देते आणि पाठीमागून वार करणाऱ्या काला पहाडाच्या भ्याडपणाची कहाणी सुद्धा सांगते. येथील मंदिरे भारताच्या कला आणि स्थापत्य परंपरेला समृद्ध करणारी ठरली आहेत. याच भूमीवर अनेक वैभवशाली साम्राज्ये उदयाला आली आणि काळाच्या प्रवाहात लयाला गेली. अनेक परकीय आक्रमकांसाठी ओडिशा ही रणभूमी ठरली आहे.

अशाच प्रकारे, ओडिशाचे राजकीय आकाश कधी संस्कृतीच्या प्रकाशाने उजळले तर कधी विनाशाच्या गडद अंधारात गडप झाले. उन्नती–पतनाच्या या कठीण प्रवासात एक प्रदेशाचा इतिहास सतत पुढे सरकत राहिला. उत्कलचा शूर हिंदू राजा मुकुंददेव यांच्या साहस, शौर्य आणि सामर्थ्याची गौरवशाली कथा सांगत.

इतिहास साक्ष देतो की सारंगगडचे तत्कालीन सेनापती रामचंद्र भंज यांनी राजा मुकुंददेव यांच्या विरोधात बंड करून स्वतःला ओडिशाचा राजा घोषित केले. चारही बाजूंनी संकटाचे ढग गडद होत चालल्यामुळे राजा मुकुंददेव यांच्यावर आपत्ती कोसळली. दुसरा मार्ग न दिसल्याने त्यांनी सुलैमान कराणी यांच्याशी करार केला. पण हा करार त्यांना संकटातून वाचवू शकला नाही; उलट परिस्थिती आणखी गंभीर झाली. अखेरीस सन् 1568 मध्ये राजा मुकुंददेव पराभूत झाले आणि त्यांचे निधन झाले. इतिहास हेही सांगतो की त्यांच्या स्वतःच्या लोकांनीच पाठीमागून वार करून त्यांची हत्या केली. यावरून हे स्पष्ट होते की उत्कलच्या या शूर हिंदू राजावर समोरासमोर हल्ला करण्याचे धैर्य कोणातच नव्हते.

DHARMENDRA PRADHAN

DHARMENDRA PRADHAN

धर्मेंद्र प्रधान आले…

आज त्या पवित्र भूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित आहेत. भाषेवर आधारित स्वतंत्र राज्य म्हणून ओडिशा निर्माण होऊन शताब्दीपूर्ती होण्यासाठी आता केवळ एक दशक उरले आहे, आणि देशात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. भारताला सबळ आणि एकसंध राष्ट्र बनविणाऱ्या तसेच आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या महान पुरुषांच्या जयंतीनिमित्त धामनगरच्या या पवित्र भूमीच्या विकासासाठी नवी योजना आखल्या जात आहेत. सरदार पटेल यांनी देशातील 560 संस्थानांसह ओडिशाच्या 26 गडजात संस्थानांचेही एकीकरण केले होते. उत्कलच्या या संस्थानांना एकत्र आणण्याचे नेतृत्व उत्कलकेशरी हरेकृष्ण महताब यांनी केले.

आवाहन काय?

विशाल भारताची कल्पना करणाऱ्या लोहपुरुषांच्या आत्मनिर्भरतेच्या मंत्रासह आज संपूर्ण भद्रक जिल्हा उत्साहाने धावत सुटला. सरदार पटेल यांनी आपल्या अदम्य राष्ट्रभक्ती, असाधारण नेतृत्व आणि दृढ निश्चयाच्या बळावर अनेक संस्थानांना एकत्र आणून अखंड भारताची निर्मिती केली. त्यांचे हे कार्य आपणा सर्वांसाठी एक कालजयी प्रेरणा आहे. जयंती सोहळ्याच्या जनसभेत भाषण करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखंड भारताचे शिल्पकार सरदार पटेल यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच आदर्शाने प्रेरणा घेऊन मातृभूमीचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्वांनी समर्पित प्रयत्न करावेत, असे प्रधान आवाहन केले.

कलिंगचे शेवटचे हिंदू राजा मुकुंददेव हे षड्यंत्राचे बळी ठरले होते. कपटी योजनांच्या कारस्थानात आणि काला पहाडाच्या आक्रमणामुळे ओडिया अस्मितेला मोठा आघात बसला. येथे मुकुंददेव यांनी कधीही समझोता केला नव्हता; त्यांनी शौर्याने युद्ध केले. पण पाठीमागून काला पहाडाने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. आत्मनिर्भरतेच्या संकल्पाला बळकटी देण्यासाठी ही एकता पदयात्रा समर्पित करण्यात आली. या प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी डॉ. हरे कृष्ण महताब आणि सरदार पटेल यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. भद्रक जिल्ह्यातील धामनगरच्या गोहिराटिकिरी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेण्याचे सौभाग्य त्यांनी लाभले. तेथे असलेल्या 500 वर्षे जुन्या विशाल वृक्षाची पूजा करून त्यांनी गहन आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतला. त्यांनी सांगितले की गोहिराटिकिरी हे स्थान अत्यंत रमणीय असून लवकरच ते भक्तिभावाने परिपूर्ण तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!