AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच जाणवलं, त्यामुळे सिक्कीम सरकारने तातडीने हा निर्णय रद्द केला. Five Days Week cancelled

'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द
नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 11, 2020 | 9:47 AM
Share

गंगटोक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय रद्द केला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय तमंग सरकारने मागे घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येईल. (Sikkim Government Employees Five Days Week cancelled)

‘सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ सत्तेत आल्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच तमंग सरकारला जाणवलं, त्यामुळे तातडीने हा निर्णय रद्द करण्यात आला. एक एप्रिलपासून होणारी अंमलबजावणी ‘एप्रिल फूल’ ठरावी, अशी प्रार्थना आता सिक्कीम सरकारमधील कर्मचारी करत आहेत.

असं का झालं?

गेल्या वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधानकारक कामगिरी केली नाही, कार्यप्रणालीत अपेक्षित बदल झाला नाही, शनिवार-रविवार सुट्टी मिळूनही अन्य दिवशी काम सुधारलं नाही, असं लक्षात आल्यामुळे सिक्कीम सरकारने निर्णय मागे घेतला.

हेही वाचा ‘त्या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा नाही, शासन निर्णय जारी!

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत केला होता. त्यानुसार 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करत होते.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

आतापर्यंत कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 व्हायचे. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होत असत.

पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.

Five Days Week cancelled

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...