‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच जाणवलं, त्यामुळे सिक्कीम सरकारने तातडीने हा निर्णय रद्द केला. Five Days Week cancelled

'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द
नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 9:47 AM

गंगटोक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय रद्द केला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय तमंग सरकारने मागे घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येईल. (Sikkim Government Employees Five Days Week cancelled)

‘सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ सत्तेत आल्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच तमंग सरकारला जाणवलं, त्यामुळे तातडीने हा निर्णय रद्द करण्यात आला. एक एप्रिलपासून होणारी अंमलबजावणी ‘एप्रिल फूल’ ठरावी, अशी प्रार्थना आता सिक्कीम सरकारमधील कर्मचारी करत आहेत.

असं का झालं?

गेल्या वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधानकारक कामगिरी केली नाही, कार्यप्रणालीत अपेक्षित बदल झाला नाही, शनिवार-रविवार सुट्टी मिळूनही अन्य दिवशी काम सुधारलं नाही, असं लक्षात आल्यामुळे सिक्कीम सरकारने निर्णय मागे घेतला.

हेही वाचा ‘त्या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा नाही, शासन निर्णय जारी!

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत केला होता. त्यानुसार 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करत होते.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

आतापर्यंत कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 व्हायचे. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होत असत.

पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.

Five Days Week cancelled

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.