AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Article 370 : मोदी सरकारच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ, संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याची घोषणा करत राज्याचा विशेष दर्जा हटवला आहे. तसेच जम्मू काश्मीरचे विभाजन करुन विभाजित भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केली. या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.

Article 370 : मोदी सरकारच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ, संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 05, 2019 | 7:49 PM
Share

इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याची घोषणा करत राज्याचा विशेष दर्जा हटवला आहे. तसेच जम्मू काश्मीरचे विभाजन करुन विभाजित भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केली. या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानने या निर्णयाची घोषणा होताच मंगळवारी (6 जून) पाक संसदेचे संयुक्त सत्र आयोजित केले.

पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त सत्राची घोषणा केली. मंगळवारी सकाळी 11 वाजता हे सत्र सुरु होईल. यात काश्मीरमधील बदलत असलेल्या स्थितीवर चर्चा होईल. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील. पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, चीफ ऑफ द एअर मार्शल मुजाहिद अनवर खान यांच्यासह अनेक वरिष्ठ सैनिक अधिकारी या संयुक्त सत्रात सहभागी होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (5 ऑगस्ट) राज्यसभेत 2 महत्त्वाटे विधेयक सादर केले. यानुसार जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले जाणार आहेत. तसेच राज्याचे विभाजन करत त्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर असे 2 भाग करण्यात येतील. या निर्णयांमुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आहे. तसेच या भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली.

कलम 370 काय आहे? (What is Article 370)

भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. भारतीय संविधाना अंतर्गत जम्मू काश्मीरचं स्वतंत्र संविधान आहे.

1947 साली भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरीसिंह यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी भारताकडे मदत मागितली. केंद्र सरकार आणि हरीसिंह यांच्यामध्ये 26 ऑक्टोबर 1947 रोजी विलीनीकरणाचा करार झाला आणि कलम 370 अस्तित्वात आले.

जम्मू काश्मीरमध्ये पहिलं हंगामी सरकार स्थापन केल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला यांनी भारतीय संविधानाच्या कक्षेबाहेर राहण्याची शिफारस केली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा या कलमाला विरोध होता. त्यांनी या कलमामुळे भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. नंतर या कलमाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर सोपवली.

1951 मध्ये राज्याला एक वेगळी घटना समिती स्थापन करण्याची परवानगी दिली. नोव्हेंबर 1956 मध्ये ही घटना तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा सुरुवातीला तात्पुरत्या स्वरुपाचा होता. मात्र अजूनही हा दर्जा कायम आहे. हा दर्जा काढून घेण्याची मागणी वारंवार होते. काश्मीरमध्ये मोठी समस्या उद्भवल्यावर हा मुद्दा कायम चर्चेत येतो.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.