AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात….

दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, निकाल येण्यास अजून थोडासा वेळ लागेल, असं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या.

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात....
| Updated on: Jul 16, 2020 | 1:15 PM
Share

पुणे : बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. मात्र आता राज्यातील एसएससी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. (SSC Board Chairperson Shakuntala Kale on SSC Results Date)

“लॉकडाऊनच्या काळात उत्तरपत्रिका तपासणी, शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षकांकडून घरुन पेपर तपासून घेतले. गावागावात विभागलेले पेपर गोळा करण्याचं मोठं आवाहन होते. मातर रेड झोनमधूनही पेपर गोळा केले, एकही कार्यालय बंद नव्हते, तीन शिफ्टमध्ये काम सुरु होते” अशी माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेनंतर काही पेपर पोस्ट ऑफिसमध्ये अडकले होते. मात्र आता ते वाटप झालं, ते काम अंतिम टप्प्यात आहे, निकाल येण्यास अजून थोडासा वेळ लागेल, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा : बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के गुण होते? शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलैचा उत्तरार्ध आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं सांगितलं होतं.

बारावीचा निकाल जाहीर

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल.

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के

कोकण – 95.89 टक्के पुणे – 92.50 टक्के कोल्हापूर – 92.42 टक्के अमरावती – 92.09 टक्के नागपूर – 91.65 टक्के लातूर – 89.79 टक्के मुंबई –89.35 टक्के नाशिक – 88.87 टक्के औरंगाबाद – 88.18 टक्के

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

कोणत्या शाखेचा निकाल किती टक्के?

विज्ञान – 96.93 टक्के वाणिज्य – 91.27 उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – 86.07 कला – 82.63

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14,13,687 उत्तीर्ण विद्यार्थी – 12,81,712 उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 93.88 उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 88.04 दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 93.57 टक्के उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी निकाल – 39.03 टक्के उत्तीर्ण 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

संबंधित बातम्या 

 बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%

बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

(SSC Board Chairperson Shakuntala Kale on SSC Results Date)

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.