AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी […]

सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी एका शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा जावईशोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व सरकारने लावला आहे. नाशिक येथील एका शेतकऱ्याला त्याचे 40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्रात झालेल्या नुकसानी पोटी 5 हजार तर वर्धा येथील एका शेतकऱ्याला त्याचे 5 गुंठे क्षेत्रात झालेल्या नुकसानीपोटी 1 हजार नुकसान भरपाई जाहीर केली आहे . प्रत्यक्षात राज्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते .

राज्यातील एकूण 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार 195 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून 6 हजार 834 हेकटर क्षेत्रावर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील 25 तर मे महिन्यात राज्यातील 13 जिल्ह्यातील पिके व फळपिकांचे नुकसान झाले असून राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने 18 डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे .

बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी मदत अनुज्ञेय असणार आहे . पिकांच्या नुकसानीकरीता आलेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .

सरकारी आकडेवारी पाहता अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला असेच म्हणावे लागेल, अधिकारी व सरकारने हा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला हे प्रश्नचिन्ह आहे

नुकसान भरपाईची विभागनिहाय आकडेवारी :

  • राज्यातील 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार नुकसान भरपाई
  • नागपूर विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 24 लाख
  • अमरावती विभागातील 856 शेतकऱ्यांना 574.66 हेकटर क्षेत्रासाठी 79 लाख 93 हजार
  • औरंगाबाद विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 45 लाख
  • नाशिक विभागातील 1899 शेतकऱ्यांना 659.70 हेकटर क्षेत्रासाठी 97 लाख 35 हजार
  • पुणे विभागातील 4773 शेतकऱ्यांना 2101.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 52 लाख
  • कोकण विभागातील 3382 शेतकऱ्यांना 991.31 हेकटर क्षेत्रासाठी 2 कोटी 7 लाख
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.