AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडत आहेत.(statistics of crimes against women in 2019 average 87 rape cases in a day)

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल
| Updated on: Oct 01, 2020 | 12:33 PM
Share

दिल्ली : हाथरसमधील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडत असून महिला असुरक्षिततेच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागने (NCRB) दिली आहे. (statistics of crimes against women in 2019 given by NCRB)

देशात महिला अत्याचाराच्या घटनेत 7.3 टक्क्यांनी वाढ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील वर्षी (2019) महिलांवरील अत्याचाराचे एकूण चार लाख पाच हजार गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद आहे. तर 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महिला अत्याचाराच्या प्रमाणात तब्बल 7.3 टक्क्यांनी वाढ झाली. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर एक लाख महिलांमागे 117 महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तसेच प्रतिलाख महिलांमागील अत्याचाराच्या घटनात आसाम सर्वात वरच्या स्थानावर आहे.

देशात सर्वाधिक गुन्हे हे भारतीय दंड संहितेअंतर्गत नोंदवले गेले. 30 टक्के गुन्ह्यांत महिलांवर घरच्या नातेवाईकांनीच लैंगिक अत्याचार केले. तर 21.8 टक्के गुन्ह्यांत महिलांवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. 17.9 गुन्ह्यांत महिलांचे अपहरण करण्यात आले. तर 7.9 टक्के महिलांवर बलात्कार झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी सांगते.

बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान सर्वात पुढे, सुशिक्षित केरळ दुसऱ्या स्थानावर राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या ताज्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थामध्ये एकूण 5997 बलात्काराचे गुन्हे घडले असून हे प्रमाण 15.9 टक्के आहे. तर 100 टक्के सुसिक्षित म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये प्रति 1 लाख महिलांमागे 11 महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. महिला सामाजिक तिरस्कार, प्रतिष्ठेच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे महिला अत्याचारांचा हा आकडा यापेक्षाही मोठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

(statistics of crimes against women in 2019 given by NCRB)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.