AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनमताचा कौल महागठबंधनला होता, NDA निवडणूक आयोगामुळे जिंकली; तेजस्वी यादवांचा आरोप

मतमोजणी करताना रडीचा डाव खेळला गेला. त्यामुळे पोस्टल बॅलेटसची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली. | Tejashwi Yadav demands recounting of votes

जनमताचा कौल महागठबंधनला होता, NDA निवडणूक आयोगामुळे जिंकली; तेजस्वी यादवांचा आरोप
| Updated on: Nov 12, 2020 | 4:36 PM
Share

पाटणा: बिहारच्या जनतेचा कौल महागठबंधनला (Mahagathbandhan) होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कृपेमुळे एनडीए (NDA) जिंकली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav ) यांनी केला. हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वी 2015 साली जनमताचा कौल मिळाल्यामुळे महागठबंधनची सत्ता स्थापन झाली होती. मात्र, तेव्हाही भाजपने मागच्या दाराने सत्ता हस्तगत केली, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले. (RJD leader Tejashwi Yadav demanded recounting of postal ballot votes)

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. मात्र, निवडणूक आयोगाने महागठबंधनच्या पारड्यातील दान ‘एनडीए’च्या पारड्यात टाकले, असा दावा त्यांनी केला. मतमोजणी करताना रडीचा डाव खेळला गेला. त्यामुळे पोस्टल बॅलेटसची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.

जवळपास 20 जागांवर राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांचा अत्यंत थोड्या फरकाने पराभव झाला आहे. तर अनेक मतदारसंघांमध्ये टपालाद्वारे आलेली मते अवैध ठरवण्यात आली. आम्हाला जनतेचा पाठिंबा होता. मात्र, ‘एनडीए’ने पैसा, छळ आणि ताकदीच्या जोरावर सत्ता हस्तगत केली. आमच्या अनेक उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील पोस्टल बॅलेटस् अवैध का ठरवली, याचे कारण सांगण्यात आलेच नाही, असा दावाही तेजस्वी यादव यांनी केला.

‘बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार’, तेजस्वी यादव यांचं आमदारांना आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज (12 नोव्हेंबर) महागठबंधनच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

(RJD leader Tejashwi Yadav demanded recounting of postal ballot votes)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.