AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15000 पगार, दोन वीक ऑफ, काम मोबाईल चोरण्याचं!

नवी दिल्ली : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांची चौकशी करताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या गँगबाबत विचारणा केली. तेव्हा या चोरांनी त्यांची कुठली गँग नसून एक कंपनी असल्याची माहिती दिली. ही कंपनी कुठली साधी-सुधी कंपनी नसून ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखी आहे. या चोरांच्या कंपनीमध्ये त्यांना मोबाईल चोरण्याचं टार्गेट […]

15000 पगार, दोन वीक ऑफ, काम मोबाईल चोरण्याचं!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांची चौकशी करताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या गँगबाबत विचारणा केली. तेव्हा या चोरांनी त्यांची कुठली गँग नसून एक कंपनी असल्याची माहिती दिली. ही कंपनी कुठली साधी-सुधी कंपनी नसून ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखी आहे. या चोरांच्या कंपनीमध्ये त्यांना मोबाईल चोरण्याचं टार्गेट दिलं जायचं आणि टार्गेट पूर्ण केलं तर त्याचं बक्षीसही मिळायचं. इतकंच नाही तर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या चोरांना आठवड्याला दोन दिवसांची सुट्टीही मिळायची.

दिल्ली पोलिसांनी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या गँगमध्ये आणखी कोण कोण आहे? याबाबत पोलिसांनी त्यांना विचारणा केली. तेव्हा त्या चोरट्यांनी आमची कुठलीही गँग नाही, तर आम्ही कंपनीत काम करत असल्याचं सागितलं. हे ऐकल्यावर पोलिसांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्या चोरट्यांनी सांगितलं की, आम्ही एका कंपनीत काम करतो, तिथे आम्हाला पाच दिवस काम करायचं असतं आणि शनिवार, रविवार या दोन दिवशी सुट्टी असते. आम्हाला टार्गेट दिलं जातं, म्हणजेच मोबाईल चोरण्यासाठी सांगितलं जातं. कंपनीमध्ये नोकरीवर ठेवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजेच मोबाईल चोरट्याला दररोज 500 रुपये त्यासोबत शाकाहारी, मांसाहारी जेवण आणि मद्य मोफत दिलं जातं. पण मोबाईल चोरण्याचं टार्गेट पूर्ण केल्यावरच त्यांना हे सर्व मिळतं, असंही त्या चोरट्यांनी सांगितलं.

चोरांची ही कंपनी चमन लाल नावाची व्यक्ती चालवतो. बोपी विश्वास नावाचा व्यक्ती या चमन लालचा खास आहे. या लोकांनी ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना नोकरीवर ठेवलं होतं. यांच्याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच जणांना यांनी नोकरीवर ठेवलं असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे चोरटे महिन्याच्या सुरुवातीचे 10 दिवस जास्त मेहनत करायचे. दिल्लीच्या कुठल्याही भागात मोबाईल चोरण्याची या चोरट्यांना मुभा होती. पण, ओमप्रकाश आणि ज्ञानेश यांची एनबी रोड ते बदरपूर, कालका मंदिर ते मां आनंदमयी मार्ग, आऊटर रिंग रोड ते बीआरटी या मार्गांवर चालणाऱ्या डीटीसी आणि क्लस्टर बस यांना खास पसंती होती. ते या मार्गावर दिवसाला 7 ते 8 मोबाईल चोरायचे. मोबाईल चोरी करण्यासाठी हे चोरटे बसच्या मागे ऑटो घेऊन जायचे. मोबाईल चोरी केल्यानंतर ते बसमधून उतरुन ऑटोत बसून पळ काढायचे, अशी माहिती या चोरट्यांनी दिली.

दिल्लीमध्ये चोरी केलेले मोबाईल तिथेच विकले जात नव्हते. तर गुरुदासपूर येथील सनी नावाचा व्यक्ती दर आठवड्याला हे मोबाईल या कंपनीकडून खरेदी करायचा. यामध्ये आयफोनला सर्वात कमी मागणी असते. कारण आयफोनचा आयएमईआय नंबर बदलणे कठीण असते. तसेच, याचे पार्ट्सही सहजासहजी विकले जात नाहीत. तर सॅमसंगच्या मोबाईलला या चोर बाजारात मोठी मागणी आहे. सर्वात जास्त नफा हा सॅमसंगच्या फोनवर होतो. पण, सॅमसंगचा महागतला मोबाईलही 10 हजारपेक्षा जास्त किंमतीत विकला जात नाही.

चोरट्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुरुदासपूर येथे सनीला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

VIDEO :

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.