AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्र्याची जबाबदारीही…; उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कुत्र्याची जबाबदारीही...; उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका
| Updated on: Feb 10, 2024 | 1:17 PM
Share

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकार गुंडांच्या पाठीमागे असेल तर गुंडगिरी वाढणार

सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभं रहात असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती मेलेडी खाओ सब जान जाओ. आता अशी परिस्थिती आहे ती ‘भाजपमे आओ सब भूल जाओ’ ही मोदी गॅरेंटी आहे. सरकार गुंडांच्या मागे उभं राहिलं तर अशीच गुंडगिरी राहील. यापुढच्या पिढ्या, आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का असा जनेतला प्रश्न जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

अभिषेक घोसाळकर प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही

भिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी मोठा संशय व्यक्त केला. दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरची फेसबूक लाइव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. मात्र या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. अभिषेकवर गोळ्या झाडण्यात आल्याचं फेसबूक लाइव्ह दरम्यान दिसलं, पण त्याच्यावर गोळ्या कोणी झाडल्या ते दिसतं नाहीये. मॉरिसने त्याला मारलं तरी मग त्याने स्वत:ला का संपवलं? त्याच्याकडे लायसन्स असलेलं पिस्तुल नव्हतं. त्याने हत्येसाठी त्याच्या बॉडीगार्डचं पिस्तुल वापरलं. पण त्या मॉरिसने मुळात बॉडीगार्ड का ठेवला होता ? त्याच्यावर अशी वेळ का आली होती ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अभिषेकवर गोळ्या खरंच मॉरिसने चालवल्या की इतर कोणी, त्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का ? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.