AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्ड म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हे : UIDAI

आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही, असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) स्पष्ट केलं आहे.

आधार कार्ड म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हे : UIDAI
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
| Updated on: Feb 19, 2020 | 4:28 PM
Share

हैदराबाद : आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही, असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) स्पष्ट केलं आहे. हैदराबाद येथे 127 जणांनी बनवाट कागदपत्रांमार्फत आधारकार्ड प्राप्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर प्राधिकरणाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे (UIDAI issues notices to 127 people). दरम्यान, प्राधिकरणाने बनावट कागदपत्रांच्यामार्फत आधारकार्ड प्राप्त करणाऱ्या सर्व 127 जणांना नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमध्ये 127 जणांनी बनावट कागदपत्रे दाखवत आधार कार्ड बनवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती प्राधिकरणाला दिली. प्राधिकरणाने या माहितीच्या आधारावर तातडीने कारवाई करत पोलिसांमार्फत नोटीस बजावली (UIDAI issues notices to 127 people). या नोटीस अंतर्गत खोट्या कागदपत्रांमार्फत आधार कार्ड बनवणाऱ्या 127 जणांना 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या वेळेपर्यंत त्यांनी यावर आपली कागदपत्रे खरी असल्याचे सिद्ध करायची आहेत. अन्यथा त्यांचे आधारकार्ड रद्द होणार आहेत.

“आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही. नियमानुसार जी व्यक्ती भारतात 182 दिवसांपेक्षा जास्त दिवस म्हणजे सहा महिन्यांपेक्षा दिवस वास्तव्यास असेल त्या व्यक्तीला आधार कार्ड दिलं जातं”, असं स्पष्टीकरण प्राधिकारणाने दिलं. दरम्यान, भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनसीआर, एनपीआर यांच्यावरुन वाद-विवाद सुरु असताना आधार कार्डबाबत अशाप्रकारची माहिती समोर आल्यानंतर देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ओवेसींची केंद्र सरकारवर टीका

प्राधिकरणाकडून 127 जणांना नोटीस बजावण्यात आल्याच्या गोष्टीचा धागा पकडत एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “आधार कार्डवरुन नागरिकत्व सिद्ध होत नाही, असं आधार कार्डचं सेक्शन नऊ सांगतं. मग प्राधिकरणाला कुणाच्याही नागरिकत्वाचा पुरावा मागण्याचा अधिकार आहे का? हे संविधानांच्या नियमांबाहेर आहे”, अशी टीका ओवेसींनी केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.