AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी
| Updated on: Jul 17, 2019 | 6:16 PM
Share

सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा गोळीबार गावाचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आलं. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेटची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांना स्वत: या घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना आरोग्यासेवा पुरवण्यात कुठलाही हलगर्जीपणा होता कामा नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईतील टीव्ही अँकरला अश्लील मेसेज, विकृताला पश्चिम बंगालमधून अटक

किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड

VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.