AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी
| Updated on: Jul 17, 2019 | 6:16 PM
Share

सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा गोळीबार गावाचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आलं. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेटची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांना स्वत: या घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना आरोग्यासेवा पुरवण्यात कुठलाही हलगर्जीपणा होता कामा नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईतील टीव्ही अँकरला अश्लील मेसेज, विकृताला पश्चिम बंगालमधून अटक

किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड

VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...