AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात भीषण पाणीटंचाई, 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नागपूर : राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून अवघा 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यातील पाण्यासंदर्भात चिंता वाढली आहे. आता मे महिना सुरु आहे. पाऊस सुरु होण्याला साधारण महिनाभराचा अवधी बाकी असताना, राज्यातील बरीच धरणं तळाला गेली असल्याने भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागानुसार धरण प्रकल्पांबाबत महाराष्ट्रात सहा विभाग पाडले […]

राज्यात भीषण पाणीटंचाई, 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नागपूर : राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून अवघा 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यातील पाण्यासंदर्भात चिंता वाढली आहे. आता मे महिना सुरु आहे. पाऊस सुरु होण्याला साधारण महिनाभराचा अवधी बाकी असताना, राज्यातील बरीच धरणं तळाला गेली असल्याने भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

जलसंपदा विभागानुसार धरण प्रकल्पांबाबत महाराष्ट्रात सहा विभाग पाडले जातात. यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे अशा सहा विभागांचा समावेश होतो.

महाराष्ट्रात कुठल्या विभागात किती धरण प्रकल्प?

  • अमरावती – 446
  • औरंगाबाद – 964
  • कोकण – 176
  • नागपूर – 384
  • नाशिक – 571
  • पुणे – 726
  • एकूण – 3267

कुठल्या धरणात किती पाणीसाठा? (3 मे 2019 ची आकडेवारी)

  • अमरावती – 23.92 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 20.65 टक्के पाणीसाठा)
  • औरंगाबाद – 5.11 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी -27.75 टक्के पाणीसाठा)
  • कोकण – 39.86 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 45.91 टक्के पाणीसाठा)
  • नागपूर – 10.3 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 15.69 टक्के पाणीसाठा)
  • नाशिक – 17.62 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 30.81 टक्के पाणीसाठा)
  • पुणे – 21.43 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 33.87 टक्के पाणीसाठा)

म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण 3267 धरण प्रकल्पांमध्ये आजच्या घडीला 18.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हा पाणीसाठा 29.95 टक्के एवढा उपलब्ध होता.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी आणि यंदाची आजच्या दिवसाच्या आकडेवारी तपासली असता किंवा तुलना केली असता, यंदाची भीषण पाणीटंचाई तात्काळ लक्षात येते. विशेषत: औरंगाबाद विभागात पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.