AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात (Wedding on Wardha border during lockdown) आला आहे.

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल
| Edited By: | Updated on: May 06, 2020 | 4:19 PM
Share

वर्धा :राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात (Wedding on Wardha border during lockdown) आला आहे. त्यामुळे अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहे. याच दरम्यान वर्धा-यवतमाळच्या सीमेवर एक अनोखा लग्न समारंभ पार पडला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने वधू-वराचे लग्न थेट वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या लग्न समारंभात पोलिसांनीही सहभाग घेतला. तसेच एका पोलिसाने वधूच्या मामाची भूमिका (Wedding on Wardha border during lockdown) निभावली.

यवतमाळ जिल्ह्यातील घारफळच्या रावबाजी आहाके यांचा मुलगा विठ्ठला याचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लादगड येथील अशोकराव मरसकोल्हे यांची मुलगी प्रविणाशी लग्न जुळले होते. या दोघांचे 6 मे रोजी लग्न ठरले होते. त्यानुसार विवाह मुहूर्त उरकविण्याची तयारी करण्यात आली. लग्नसाठी परवानगी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण परवानगी मिळालीच नाही. त्यामुळे नवरदेव मोठ्या हिंमतीने थेट वर्धा येथे जाण्यास निघाला. पण वर्ध्या जिल्ह्याच्या सीमेवरच पोलिसांनी नवरदेवाला रोखले.

पोलिसांनी रोखल्यामुळे लग्नाचा मुहूर्त जाणार, हळदीच्या विधीवरही पाणी फिरणार होते. पण पोलिसांनीच थेट वधूला सीमेवर बोलावून घेण्याचा सल्ला वराला दिला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या नदी काठाजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली वधू-वराचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी खाकीतल्या एका पोलिसाने वधूच्या मामाचीही भूमिका बजावली.

यावेळी वराच्या सोबतीला असलेल्या भटजींनी आदिवासी पद्धतीने विवाह पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. पोलिसांनी आपल्या बसण्याकरिता असलेल्या खुर्च्या वधू-वराला उपलब्ध करून दिल्या. वर आणि वधूला मंगलाष्टकांच्या साक्षीने अक्षदा टाकून शुभमंगल सावधान करण्यात आले. लिंबाच्या झाडाखालीच पोलीस वऱ्हाडी बनले. नावदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी खाकीतल्या पोलिसाने मुलीच्या मामाची भूमिका बजावली.

अत्यंत साधेपणाने आणि अतिशय कमी वेळेत आदिवासी पद्धतीने हा विवाह पार पडला. लग्न उरकवून नवरदेव आपल्या वधूला घेऊन परतीच्या वाटेवर निघाले.

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच वर्धा, यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांच्या कडक पाहऱ्यात कुणी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊच शकत नाही अशीच इथली परिस्थिती. त्यामुळे हा लग्न सोहळा जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला.

मे महिना तसा लग्नसराईच्या महिना आहे. पण लॉकडाऊनमुळे या महिन्यातील लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत. काहीजण अगदीच पाच लोकांमध्ये लग्न समारंभ उरकून घेत आहेत. पण यातील कुठलाच पर्याय कामी न पडल्यामुळे अखेर सीमेवरच लग्न आणि कन्यादान झाले. ओझरत्या नजरेने वधुने आपल्या आई – वडिलांकडून आशीर्वाद घेतले.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

Lockdown : शेतातील मंदिराच्या ओट्यावर लेकीचं लग्न लावलं, निफाडच्या शेतकऱ्याचं राज्यभर कौतुक

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.