AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्न पॅकिंगसाठी काय सुरक्षित; अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? अन्यथा आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

आपण बऱ्याचदा अन्न पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का की यांपैकी नक्की कोणता पेपर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. होय, यामुळे पोटाचे आजार ते मेंदुच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. मग तो बटर पेपर की अॅल्युमिनियम फॉइल नक्की कोणता पेपर अन्न पॅकिंगसाठी सुरक्षित आहे जाणून घेऊयात.

अन्न पॅकिंगसाठी काय सुरक्षित; अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? अन्यथा आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
Butter Paper for Food Packaging, Which is SaferImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 14, 2025 | 1:43 PM
Share

आपण बऱ्याचदा पदार्थ पॅकिंग करताना किंवा टीफिनमध्ये देखील पोळी वैगरे घेऊन जाण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपर किंवा बटर पेपरचा वापर करत असतो. अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येकाचे अन्न टिफिनमध्ये अशाचपद्धतीने पॅक केले जाते. काही लोक अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात, तर काही लोक त्यांचे अन्न बटर पेपरमध्ये गुंडाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या दोन पर्यायांपैकी एक तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो?

अन्न पॅक करण्यासाठी काय वापरावे चांगले?

तुम्हाला माहितीये का की, अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा पॅकिंगसाठी बटर पेपर हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर, अॅल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये अन्न गरम राहतं पण त्यात असे गरम अन्न पॅक करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.कसं ते जाणून घेऊयात.

जेव्हा गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळले जाते तेव्हा फॉइलमध्ये असलेले काही कण अन्नात त्याच्या गरमपणामुळे त्या अन्नात मिसळू शकतात. जे तुमच्या आरोग्याला नक्कीच हानी पोहोचवू शकतात. अॅल्युमिनियम फॉइल अन्नासोबत त्या कणांची प्रतिक्रिया होऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही असे अन्न खाता तेव्हा त्यामुळे पोटाच्या आरोग्यावर, हाडांच्या आरोग्यावर आणि मेंदूच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जे कोणी अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात त्यांनी ते वापरणं ताबडतोब बंद करावं अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

बटर पेपरमुळे काही नुकसान होऊ शकते का?

सेल्युलोजपासून बनवलेला बटर पेपर आरोग्याला हानी पोहोचवत नाही. जर तुम्ही अन्न पॅक करण्यासाठी बटर पेपर वापरला तर अन्नातील अतिरिक्त तेल उलट त्या पेपरमुळे शोषले जाते.तसेच त्याची अन्नासोबत कोणतीही प्रतिक्रिया होत नाही. याशिवाय, बटर पेपर अन्नात ओलावा जाण्यापासून देखील रोखतो. एकंदरीत, बटर पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा अनेक पटीने चांगला मानला जातो. त्यामुळे फॉइलपेक्षा बटरपेपर वापरणे कधीही चांगले.

बटर पेपरमध्ये कोणते पदार्थ पॅक करू शकतो? 

दरम्यान बटर पेपरमध्ये तुम्ही मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, पराठे, रोटी सहजपणे पॅक करू शकता. इतकेच नाही तर हा पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा जास्त तापमान देखील सहन करू शकते, म्हणून तुम्ही त्यात गरम रोटी, पराठे देखील पॅक करू शकता. त्यामुळे अन्न पॅक करण्यासाठी बटर पेपर वापरा आणि प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी काचेच्या कंटेनरमध्ये तुमचे अन्न पॅक करू शकता. कारण त्यामुळे तुमचे अन्न प्लास्टिकशी प्रतिक्रिया करू शकते पण काचेसोबत नाही. याशिवाय, तुम्ही सिलिकॉन कंटेनर देखील वापरू शकता.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक