AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बहुतेक साबण किंवा शैम्पू बराच वेळ लावल्यानंतर त्यांचा त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. म्हणून, साबण किंवा शैम्पू वापरल्यानंतर, शॉवरखाली शरीर आणि केस पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊन फाटू शकते.

Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक
अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 8:21 PM
Share

मुंबई : निरोगी शरीर आणि उत्तम आरोग्यासाठी दररोज अंघोळ(Bath) करणे ही एक चांगली सवय आहे. नियमित अंघोळ केल्याने आपल्या त्वचेवरील, केसांमधील घाण साफ होते. यामुळे आपल्याला अंघोळ केल्यानंतर खूप फ्रेश वाटते. मात्र आपल्याला माहित आहे का ? अंघोळ करताना नकळत चुका(Mistake) करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या त्वचेलाच नाही तर केसांनाही मोठे नुकसान होऊ शकते. आंघोळ करताना, आपण साबण आणि शॅम्पूमध्ये असलेल्या रासायनिक उत्पादनांची काळजी घेतली पाहिजे, ज्याचे भयानक दुष्परिणाम होऊ शकतात. ज्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी आपले नुकसानच होऊ शकते. मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह यांनी काही चुकांवर दृष्टीक्षेप टाकला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बहुतेक साबण किंवा शैम्पू बराच वेळ लावल्यानंतर त्यांचा त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. म्हणून, साबण किंवा शैम्पू वापरल्यानंतर, शॉवरखाली शरीर आणि केस पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊन फाटू शकते. (Avoid these mistakes while bathing, it can be harmful to your health)

शॉवरखाली अधिक वेळ उभे राहू नये

बऱ्याच लोकांना बराच वेळ शॉवरखाली उभं राहून अंघोळ करण्याची सवय असते. मात्र आरोग्य तज्ज्ञांनी शॉवरखाली बराच वेळ उभे राहण्याबाबत चेतावणी दिली आहे. बराच वेळ आंघोळ केल्यानंतरही त्वचा कोरडी होते. याशिवाय, त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो आणि ती संवेदनशील होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

शॅम्पू, साबण, परफ्यूम याचे होऊ शकतात दुष्परिणाम

हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, शॅम्पू, कंडिशनर आणि साबणांमध्ये असलेले तेल, परफ्यूम आणि इतर घटकांचेही तोटे आहेत. या घटकांमुळे अॅलर्जी होऊ शकते. आंघोळीची वारंवारता ही आंघोळीच्या कालावधी इतकीच महत्त्वाची असल्याचे हेल्थ बॉडीचे म्हणणे आहे. तथापि, आंघोळीची कोणतीही आदर्श फ्रीक्वेन्सी सेट केलेली नाही.

खूप वेळ आंघोळ करणे धोकादायक

खूप वेळ आंघोळ केल्याने त्वचा फाटली जाऊ शकतात, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा ऍलर्जी निर्माण करणारे घटक त्वचेत सहज प्रवेश करू शकतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा साबण देखील सामान्य जीवाणूही नष्ट करतो. यामुळे त्वचेवरील सूक्ष्मजंतूंचे संतुलन बिघडते आणि प्रतिजैविकांना अधिक प्रतिरोधक असलेल्या कमी त्वचेसाठी अनुकूल सूक्ष्मजंतूंना प्रोत्साहन मिळते. (Avoid these mistakes while bathing, it can be harmful to your health)

इतर बातम्या

Super Seeds For Skin : सौंदर्याचा खजिना आहेत या 5 बिया, आहारात नक्की करा समावेश

Black Pepper Essential Oil : आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.