AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !

उन्हाळ्यात (Summer) त्वचेला घामामुळे चिकटपणा निर्माण होतो. चेहऱ्यावर साचलेली घाण छिद्रांमध्ये जमा होते आणि मग पिंपल्सची समस्या निर्माण होते. यामध्ये त्वचेला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवावे लागते. उन्हाळ्यात स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त फेसपॅक (Facepack) किंवा फेस मास्कच्या टिप्स आपण फाॅलो केल्या पाहिजेत.

Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो कराImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 3:17 PM
Share

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) त्वचेला घामामुळे चिकटपणा निर्माण होतो. चेहऱ्यावर साचलेली घाण छिद्रांमध्ये जमा होते आणि मग पिंपल्सची समस्या निर्माण होते. यामध्ये त्वचेला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवावे लागते. उन्हाळ्यात स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त फेसपॅक (Facepack) किंवा फेस मास्कच्या टिप्स आपण फाॅलो केल्या पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते, हे मास्क केवळ त्वचा निरोगी बनवत नाहीत, तर ती दिवसभर ताजेतवाने राहण्यासही मदत करते. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे फेस मास्क (Face mask) मिळतील पण उन्हाळ्यात फळांपासून बनवलेले मास्क वापरणे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. फळांचे मास्क त्वचेला हायड्रेट ठेवतात. तसेच त्यांचे इतर गुणधर्म त्वचेला अनेक समस्यांपासून वाचवतात.

केळी आणि दूध

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केळी ही आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपली त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण केळीचा मास्क चेहऱ्याला लावायला हवा. यामुळे त्वचेवरील टॅन जाण्यास मदत होते. यासाठी आपण एक केळी मॅश करून त्यामध्ये दूध मिक्स करायला हवे. मग त्याची चांगली पेस्ट झाल्यानंतर हा मास्क संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी आपला चेहऱा थंड पाण्याने धुवा.

पपई आणि मध

पपई हे असेच एक फळ आहे, जे आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. तज्ञ आणि डॉक्टर देखील त्वचेच्या काळजीमध्ये वापरण्याची शिफारस करतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि पपेन नावाचे एन्झाईम्स आढळतात, जे त्वचेला आतून दुरुस्त करू शकतात आणि चमकदार बनवू शकतात. असे म्हणतात की पपई चेहऱ्यावर नियमितपणे लावली तर ती एकसमान टोनही देऊ शकते, मॅश केलेली पपई एका भांड्यात ठेवा आणि त्यात दोन चमचे मध टाका, हा मास्क चेहऱ्यावर लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

किवी आणि एवोकॅडो

किवी आणि एवोकॅडो ही दोन्ही फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध मानली जातात. उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाचे महत्त्व अधिकच वाढते. व्हिटॅमिन सी त्वचेला आतून निरोगी ठेवते आणि चांगली चमक आणण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील निर्जीव त्वचेला जीवन देऊ शकतात. त्याचा मास्त तयार करण्यासाठी, किवी आणि एवोकॅडो मॅश करा आणि त्वचेवर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Watermelon : निरोगी राहून वजन कमी करण्यासाठी कलिंगड अत्यंत फायदेशीर, वाचा!

Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.