AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणपणी डोक्यावर टक्कल पडत चाललंय? असू शकतात ‘ही’ तीन कारणे

प्रत्येकाला केस गळतीची चिंता सतत सतावत असते. यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण तुमचे केस का गळत आहेत हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे.

तरुणपणी डोक्यावर टक्कल पडत चाललंय? असू शकतात 'ही' तीन कारणे
| Edited By: | Updated on: Nov 09, 2024 | 12:51 PM
Share

आजच्या काळात बहुतेक लोकं हे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बाजारात आलेल्या शॅम्पू, तेल, सीरम आणि कॅप्सूलपर्यंत एकापेक्षा एक महागडी उत्पादने लोकं वापरत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील या समस्या दूर करण्यासाठी DIY हॅक्सचे व्हिडीओ भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे लोक केस गळण्याच्या समस्या रोखण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा या संभ्रमात पडली आहेत. पण जर तुम्ही केस गळण्यामागचं नेमकं कारण शोधलं, तर त्यानुसार तुम्ही केस गळती रोखण्यासाठी उपाय करू शकता.

प्रत्येकाला केस गळतीची चिंता सतत सतावत असते. यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण असे असूनही अनेकदा योग्य रिझल्ट मिळत नाही. तुमचे केस का गळत आहेत हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया केस गळण्यामागील मुख्य तीन कारणे कोणती आहेत.

केस गळतीमागील तीन कारणं

– केस गळण्याचे मुख्य कारण बघायला गेलं तर आपले शरीरचक्र योग्य नसणे. जसं कि नाश्त्यापासून ते जेवण योग्य वेळी न करणे, रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे. तसेच योगा, वर्कआऊट किंवा वॉक काहीही न करणे. यामुळे आपली दिनचर्या खूप सुस्त होते. यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य बिघडते. तसेच आपल्या शरीराला पोषक आहार न मिळाल्याने केस गळणे सुरु होते. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन दिनचर्या सुधारणे महत्वाचे आहे.

– केस गळण्याचे एक कारण म्हणजे केसाना अधिक प्रमाणात उष्णता लागणे, जसे की हेअर स्टायलिंग टूल्सचा जास्त वापर केल्याने केस गळती होण्यास किंवा केस पातळ होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही गरम पाण्याने केस धुत असाल तरीही तुमचे केस गळू शकतात. यामुळे तुमच्या क्युटिकल्सचे नुकसान होते आणि केस खराब होतात. याशिवाय बाहेर पडताना केस झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अतिनील किरणांमुळेही केसांचे नुकसान होते.

-तुम्ही जर योग्य पद्धतीने आहाराचे सेवन केल्यास शरीराला योग्य पोषण मिळते. त्यात तुम्ही बाहेरील जेव्हा जंक फूड तसेच शिळे अन्न, व आहारात अधिक मीठ, साखरेचे प्रमाण खाल्ले तर तुमचे केस गळायला लागतात. आरोग्याला नुकसान पोहोचवणारे अन्न पदार्थ खाल्ल्याने शरीराला नीटसे पोषक द्रव्ये मिळत नाहीत, यामुळे केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय शरीराला योग्य आहार न मिळाल्याने हार्मोनल असंतुलन होऊन आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. यामुळे तुमची केसगळती झपाट्याने होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.