AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rose : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये ‘हा’ खास घटक मिक्स करा, वाचा अधिक! 

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी आपण अनेक क्रीम आणि बाॅडीलोशन या हंगामात त्वचेला लावतो.

Rose : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये 'हा' खास घटक मिक्स करा, वाचा अधिक! 
गुलाब पाकळ्या
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी आपण अनेक क्रीम आणि बाॅडीलोशन या हंगामात त्वचेला लावतो. मात्र, असे करूनही म्हणावा तसा काही खास फरक जाणवत नाही.

खरोखरच आपल्याला कोरड्या त्वचेची समस्या दूर करायची असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी एकदम सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे हिवाळ्याच्या हंगामामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या झटपट कमी होते.

गुलाब पाकळ्यांमध्ये असलेले घटक

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवतात. गुलाबाच्या पाकळ्यातील दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची लालसरपणा आणि जळजळ शांत करतात. गुलाबपाणी त्वचेतील आर्द्रता संतुलित ठेवण्यास मदत करते. हे अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करते. गुलाब पाकळ्यात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेचे वृद्धत्व टाळण्यास मदत करतात.

हिवाळ्याच्या हंगामात आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक वापरा पाहिजे. हा पॅक आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतो. हे त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हे त्वचेवरील कोरड्यापणाची समस्या दूर करण्यास मदत करते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 1 चमचे गुलाब पावडर आणि 1 चमचे मध आवश्यक आहे. हे दोन्ही चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. 10 ते 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

हे देखील महत्वाचे

गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Rose petals are beneficial for relieving dry skin problems)

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.