AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

होळीचा (Holi) सण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात. मात्र, आजकाल रंग (Colors) आणि गुलालमध्ये अनेक प्रकारचे रसायने वापरली जातात. यामुळे आपल्या त्वचेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर अॅलर्जी, जळजळ, खाज सुटणे आदी समस्या निर्माण होतात.

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!
होळी खेळल्यानंतर त्वचेची अशाप्रकारे घ्या काळजी. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 8:23 AM
Share

मुंबई : होळीचा (Holi) सण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात. मात्र, आजकाल रंग (Colors) आणि गुलालमध्ये अनेक प्रकारचे रसायने वापरली जातात. यामुळे आपल्या त्वचेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर अॅलर्जी, जळजळ, खाज सुटणे आदी समस्या निर्माण होतात. काही लोकांची त्वचा (Skin Care) निस्तेज होते आणि चमक नाहीशी होते. होळीनंतर तुमच्यासोबत अशी कोणतीही समस्या उद्भवली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहोत ज्या या समस्या दूर करण्यास मदत करतात.

  1. तूप- होळी खेळल्यानंतर त्वचेमध्ये जळजळ असेल तर आपल्या त्वचेवर तूप लावा. जर आपल्याकडे तूप नसेल तर आपण खोबरेल तेल देखील लावू शकतो. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. यामुळे खाज येणे, जळजळ, पुरळ येणे इत्यादी समस्या दूर होतात. मात्र, हे नेहमी लक्षात ठेवा की, तूप किंवा खोबरेल तेल लावल्यानंतर अजिबात घराच्या बाहेर पडू नका.
  2. एलोवेरा- एलोवेरा जेल त्वचेला ग्लो आणण्यासोबतच स्किन अॅलर्जी दूर करण्याचे काम करते. यासाठी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ कोरडे राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. शक्य असल्यास दिवसातून किमान दोनदा हे करा. या खास उपायामुळे चेहऱ्यावर एक चमक येते.
  3. कडुलिंब- तुमच्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा पुरळ बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप फायदेशीर आहेत. यासाठी सात ते आठ कडुलिंबाची पाने घ्या आणि स्वच्छ धुवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थिर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे अॅलर्जी कमी होण्यास मदत होईल.
  4. दही आणि बेसन- चेहऱ्यावरील रंग काही केल्या जर निघत नसेल तर आपण हा खास घरगुती उपाय करून चेहऱ्यावर रंग काढू शकतो. यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे दही लागणार आहे. दही आणि बेसन चांगले मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील रंग निघून जाण्यास मदत होईल.
  5. मसूर डाळ- चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी मसूरचा पॅकही खूप उपयुक्त आहे. यासाठी लाल मसूर काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. यानंतर मसूर बारीक करून त्यात थोडे दूध आणि मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा होऊ द्या. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

Teeth | मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल

Corona | प्रसुतीकाळात मातेपासून बाळाला कोरोनाचा धोका? काय सांगतोय नवीन अभ्यास…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली