AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: पती आणि पत्नीमध्ये वयाचं किती अंतर असावं? काय सांगते चाणक्य नीति

चाणक्य नीतिबाबत आजही तितकीच उत्सुकता आहे. समाजाचं इतकं बारीक निरीक्षण त्या काळात नोंदवलं गेलं आहे याचं आश्चर्य आहे. कारण आजही त्यात काही फारसा बदल झालेला नाही. आचार्य चाणक्य यांनी पती पत्नीच्या वयाच्या अंतराबाबतही सांगितलं आहे.

Chanakya Niti: पती आणि पत्नीमध्ये वयाचं किती अंतर असावं? काय सांगते चाणक्य नीति
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 01, 2025 | 3:48 PM
Share

दैनंदिन आयुष्यातली बऱ्याच घडामोडी आपल्याला त्रासदायक ठरतात. एखादी चूक तर आपल्याला आयुष्यभर सहन करावी लागते. त्यामुळे अशा चुका वेळीच टाळता येणं गरजेचं आहे. चाणक्य नीतित याबाबत सखोल मार्गदर्शन दिलं आहे. त्यामुळे चाणक्य नीति आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. लग्न करताना पती पत्नीमध्ये किती वयाचं अंतर असावं याबाबतही त्यात सांगितलं आहे. साधारणत: भारतीय समाजात मुलाचं वय हे मुलीपेक्षा जास्त असावं असा पक्कं मनात रुजलेलं आहे. मग त्या मुलाचं वय एका वर्षाने जास्त असो की दहा वर्षांनी.. पण मुलगा मुलीपेक्षा मोठा असावा, अशी धारणा आहे. पण कधी कधी प्रेमात असं होतं की मुलींचं वय हे मुलांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे हे लग्न करावं की नाही असा प्रश्न पडतो. पत्नी वयाने मोठी असल्याची अनेक मोठी उदाहरणं आहेत. यात ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा- निक जोनस या लोकप्रिय जोड्या आहे. पण त्यांचं नातं टिकलं आहे. पती आणि पत्नीत किती अंतर असावं ते जाणून घेऊयात चाणक्य नीतिच्या माध्यमातून

पती पत्नीत किती अंतर असावं?

चाणक्य नीतिनुसार, पती पत्नी यांच्या वयात अंतर फार नसावं. हे अंतर फार तर 3 ते 5 वर्षांचं असावं. हे अंतर कमी असल्यास एकमेकांना समजून घेण्यास मदत होते. वैवाहिक आयुष्यही व्यवस्थित असतं. पण हे अंतर अधिक असेल तर पती पत्नीत वादाचं कारण ठरतं. कारण वयाची तफावत असल्याने विचार करण्याची पद्धत भिन्न असते. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचं दृष्टीकोन बदलतो. एखादी गोष्ट व्यक्तीला योग्य वाटत असेल. तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या भावना आणि अपेक्षांच्या तुलनेत त्यात उणीव वाटू शकते. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि खटके उडतात.

या वयाच्या मुलींशी लग्न करू नका

चाणक्य नीतिनुसार, वयाने खूप मोठ्या असलेल्या मुलाने कमी वयाच्या मुलीशी लग्न करू नये. कारण यामुळे दोघांचे विचार जुळणं कठीण होतं. त्यामुळे वैवाहिक आनंद फार काळ टिकत नाही. रोज काही ना काही वाद होत राहतात. त्यामुळे जोडीदार निवडतात वयातील अंतर 3 ते 5 वर्षे असावं. पण एखाद्या वयाने मोठ्या असलेल्या तरुणावर प्रेम जडलं तर लग्न करण्यापूर्वी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आचारविचारांबाबत कळतं. दोघांमध्ये चांगला तालमेल असेल तर वय हा फक्त आकडा ठरतो. अशा स्थितीत नातं चांगल्या प्रकारे टिकू शकतं.

Follow Us
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.