AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?

बाजारात अनेक प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असतात. वेगवेगळ्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या बाटल्या असल्यामुळे अनेक जण त्या बाटल्या विकत घेतात आणि मुलांसाठी देखील खरेदी करतात. पण पाणी पिण्यासाठी तांब्याची की काचेची बाटली योग्य आहे.. जाणू घ्या...

तांब्याच्या की काचेची... कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
Water Bottles
| Updated on: Apr 03, 2026 | 3:25 PM
Share

कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यास त्यांच्याकडून दिला जाणारा एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे पाणी जास्त प्या…. पाणी प्यायल्याने अनेक आजार देखील दूर होताता आणि शारीरास मोठा फायदा होतो. अनेक जण ग्लासातून तर अनेक जण बाटलीतून पाणी पिताता. पण कोणत्या बाटलीतील पाणी योग्य आहे… याबद्दल फार कोणाला माहिती नसते. बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या बाटल्या आपण घरी आणतो. पण त्या आपल्या आरोग्यास योग्य आहेत की नाही, हे आपल्याला देखील माहिती नसते…

सांगायचं झालं तर, आपल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे… पण पाणी कसे प्यावे हे तुम्हाला माहीत आहे का? पाणी साठवण्यासाठी अनेक प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. सध्या, प्लास्टिकऐवजी तांब्याच्या आणि काचेच्या बाटल्या जास्त वापरल्या जातात. यापैकी आरोग्यासाठी काय चांगले आहे? तुम्हाला माहीत आहे का…

तांब्याची बाटली

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते असे म्हटले जाते. तांब्यामध्ये नैसर्गिक सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात, जे पाण्यातील काही जीवाणूंना मारण्यास मदत करू शकतात.

परंतु याचे काही तोटे आहेत. शरीरात अतिरिक्त तांबे गेल्यास विषबाधा होऊ शकते. पाणी जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यातून धातू बाहेर पडू शकतात. यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे, तांब्याच्या बाटल्या वापरता येत असल्या तरी, वेळ आणि प्रमाण यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

काचेची बाटली

काचेच्या बाटलीतून पाणी पिणे अधिक आरोग्यदायी असते. काच हा एक अक्रियाशील पदार्थ आहे. म्हणजेच, त्याची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही. गरम असो वा थंड, कोणत्याही प्रकारचे पेय काचेच्या बाटलीत सुरक्षितपणे साठवता येते. त्याच वेळी, काही अभ्यासांनुसार काचेच्या बाटल्यांच्या प्लास्टिकच्या झाकणांमधील सूक्ष्म प्लास्टिकचे कण पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे, सिलिकॉन किंवा धातूच्या झाकणांच्या काचेच्या बाटल्या निवडल्या जाऊ शकतात. त्यामुळे काचेच्या बाटलीतून पाणी पिणे योग्य ठरु शकेल.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.