AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दही की ताक सर्वात फायदेशीर? जाणून घ्या

उन्हाळा येताच आपण अशा गोष्टी शोधतो ज्याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून संरक्षण करता येते. या ऋतूत दही आणि ताक दोन्ही खाल्ले जातात. पण दोघांपैकी शरीरासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे ते जाणून घ्या

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दही की ताक सर्वात फायदेशीर? जाणून घ्या
Curd or buttermilk which is best for summer Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 9:58 PM
Share

उन्हाळा येताच शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे होते. या ऋतूत आपण असे पदार्थ शोधत असतो जे आपल्याला केवळ थंड करत नाहीत तर शरीराला आतून पोषणही देतात. दही आणि ताक दोन्ही उन्हाळ्यासाठी सुपरफूड आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दही आणि ताक खुप आवडीने खाल्ले जातात. या दोन्ही गोष्टी पचन सुधारण्यास तसेच शरीराचे विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि उष्णता कमी करण्यास मदत करतात. पण काही लोकांना वाटते की दही आणि ताक एकच आहेत. दही आणि ताक यांच्यात बरेच फरक आहेत, जे आम्ही आज या लेखात तुम्हाला सांगणार आहोत.

दही आणि ताक यात काय फरक आहे?

दही आणि ताक हे दोन्ही दुधापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ आहेत, परंतु दोघांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. जसे दही हे एक घट्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध दुग्धजन्य पदार्थ आहे, जे दुधाला दही करून तयार केले जाते. त्यात प्रथिने, प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.

तर ताक हे दह्यात पाणी टाकून फेटून बनवले जाते, ज्यामध्ये अतिरिक्त लोणी काढून टाकले जाते. त्यानंतर तयार झालेल्या ताकात पाण्याचे प्रमाण जास्त आणि फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते हलके आणि सहज पचण्याजोगे असते.

उन्हाळ्यासाठी कोणते चांगले आहे?

1. शरीर थंड करण्यासाठी कोणते अधिक प्रभावी आहे?

ताक शरीराला अधिक थंड करते कारण ते हलके असते आणि त्यात भरपूर पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. दही देखील थंडावा देते, परंतु ते जड असते आणि यांच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढवू शकते, विशेषतः जेव्हा ते जास्त प्रमाणात सेवन केले जाते. म्हणून उन्हाळ्यात ताक हा एक चांगला पर्याय आहे.

2. पचनासाठी कोणते चांगले आहे?

ताक हलके असते, त्यामुळे ते सहज पचते आणि गॅस, अपचन आणि आम्लता दूर करण्यास मदत करते. दही जाड आणि पचनास जड असते, ज्यामुळे काही लोकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून ताक पचनासाठी अधिक फायदेशीर आहे.

3. वजन कमी करण्यासाठी दही की ताक फायदेशीर

ताकामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतात, जे वजन कमी करण्यास मदत करते. दह्यामध्ये जास्त कॅलरीज आणि फॅट असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी ताक चांगले आहे.

4. डिहायड्रेशन दूर करण्यासाठी कोणते योग्य आहे?

ताकात जास्त पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला डिहायड्रेट होण्यापासून रोखतात. दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते जास्त हायड्रेटिंग नसते. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात डिहायड्रेशन दूर करण्यासाठी ताक अधिक प्रभावी ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.