AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते.

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!
| Updated on: Jan 22, 2021 | 4:39 PM
Share

मुंबई :दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते. परंतु, आपण दूध उकळताना अनेकदा चूक करतो, त्यामुळे आपल्याला दूध पिण्याचा पुरेपूर फायदा मिळू शकत नाही. वास्तविक, आपण स्वयंपाकघरातील महिलांना बर्‍याच वेळा स्वयंपाकघरात दूध उकळताना पाहिले असेल. दूध उकळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या गॅस मंद करतात आणि दुधाला बर्‍याच वेळासाठी उकळी येऊ देतात. दूध योग्य प्रकारे उकळले पाहिजे जेणेकरून त्यामध्ये असलेले सूक्ष्मजंतू नष्ट होतील, असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते (Do not boil milk for more than one time know the reason).

याशिवाय दुधात चांगली मलई आहे, ज्याच्या मदतीने घरच्या घरी सहज तूप बनवू शकतात, या विचाराने स्त्रिया आणखी काहीवेळ दूध उकळू देतात. त्याच वेळी, काही स्त्रियांना असे वाटते की, भरपूर वेळ दूध उकळवल्याने त्यातील पोषकद्रव्ये वाढतात. परंतु, आपणसुद्धा असाच काहीतरी विचार विचार करून, दिवसातून अनेक वेळा दूध उकळवत असाल, तर मग तुम्ही मोठी चूक करत आहात.

दूध उकळण्याची कारणे :

वास्तविक दूध बराच काळ उकळवल्याने किंवा बऱ्याच वेळा उकळवून घेतले तर, त्यातील पोषकद्रव्य नष्ट होऊ लागतात, हे बऱ्याच संशोधनात सिद्ध झाले आहे. असे दूध प्यायल्याने शरीराला काहीच फायदा होत नाही. दूध उकळण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते गरम होत असताना, चमच्याने सतत ढवळत राहाणे. सतत ढवळल्यानंतर दूध उकळले की गॅस बंद करावा.

पुन्हा पुन्हा दूध उकळण्याची चूक करू नका. जितक्या जास्त वेळा ते उकळले जाईल, तितके त्यातील पोषक घटक  नष्ट होतात. म्हणून दूध शक्यतो फक्त एकदाच उकळण्याचा प्रयत्न करा. जर जास्त आवश्यकता असेल तर केवळ साधारण गरम करा, उकळू नका (Do not boil milk for more than one time know the reason).

दूध सेवन करताना ‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा!

– जर तुम्ही जेवणानंतर नियमित दूध पित असाल, तर अर्धा पोटीच जेवा. अन्यथा पचनक्रिया संबंधित त्रास उदभवू शकतात.

– कांदा आणि वांग्यासोबत कधीही दुधाचे सेवन करु नये. यामधील घटक एकमेकांत मिसळून त्वचेच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

– कधीही मासे किंवा मांस खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन करू नये. यामुळे त्वचेवर पांढरे डाग किंवा ल्युकोडर्मा सारखे आजार होऊ शकतात.

– जेवण झाल्यावर लगेच दूध पिऊ नये. खाल्लेले अन्न पचण्यास काही वेळ लागतो आणि पटकन दूध प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

(Do not boil milk for more than one time know the reason)

हेही वाचा :

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.