AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही. आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या
पाणी
| Updated on: Apr 25, 2021 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : सध्या आपल्याला कोरोना महामारीपासून बचाव करायचा आहे आणि आपली प्रतिकारशक्ती बळकट करायची आहे. यासाठी दररोज ताजी फळे खाणे फार महत्वाचे आहे. जर जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषण तत्वयुक्त फळ दररोज मोठ्या प्रमाणात खाल्ली तर एखाद्या व्यक्तीचा आजारी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दररोजच्या आहारात हंगामी आणि ताजी फळे समाविष्ट करण्याची देखील डॉक्टर शिफारस करतात. परंतु आपल्याला प्रत्येकाकडून एक सामान्य सल्ला मिळेल, तो असा की फळे खाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. जाणून घ्या यामागचे कारण काय आहे. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

पोटात पेटके किंवा गॅसची समस्या होऊ शकते

बहुतेक फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. साखर आणि यीस्टची मात्रा फळांमध्ये जास्त असते, ज्यास योग्य पचवणे आवश्यक आहे. आपण जे जेवण खातो ते पोटापर्यंत पोचल्यावर आपले पोट ते पचवण्यासाठी एक प्रकारचे अॅसिड सोडते. परंतु जर आपण फळ खाल्ले आणि ताबडतोब पाणी प्यायले तर पाण्यामुळे त्या आम्लाची क्षमता कमकुवत होते, जे पचन प्रक्रियेस धीमे करते. म्हणून, फळं खाणे आणि त्वरित पाणी पिण्यामुळे पोटात पेटके आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

अतिसार होऊ शकतो

टरबूज, काकडी, खरबूज, लीची अशा फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अशी फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास जुलाब किंवा अतिसार होऊ शकतो, कारण पचन प्रक्रिया नकारात्मक स्वरुपात अधिक वेगवान होते.

पोटाची पीएच पातळी बिघडते

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. पोटाची सामान्य पीएच पातळी आम्लीय असते, जी 1.5 ते 3.5 दरम्यान असते. तथापि, जर तुम्ही फळं खाल्ली आणि ताबडतोब पाणी प्यायलात तर पचन तंत्राची सामान्य आम्ल पातळी पाण्यात मिसळून कमी होते.

रक्तातील साखरेची पातळी वाढवते

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचन तंत्रामध्येच राहते. उर्वरित अन्न चरबीमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.

हे आजार होण्याची शक्यता

गोड फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे अपचन, खोकला किंवा साखरेची पातळी वाढण्याची शक्यता आसते, तर लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे घश्यात खवखव यासारखे त्रास होऊ शकतात. उदाहरणार्थ- पाण्यात लिंबू पिळणे ही वेगळी गोष्ट आहे आणि लिंबू चाटल्यानंतर पाणी पिण्याने शरीरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

इतर बातम्या

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.