Vastu Tips: घराच्या मुख्यद्वारा जवळ ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या जीवनात येईल दारिद्रता…
Vastushashtra Niyam for Main Door: हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असावे? ते कोणत्या दिशेने असावे? वास्तुशास्त्रात यासाठी अनेक नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीही नसाव्यात.

हिंदू धर्मामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यास तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूदोष निर्माण होतो. वास्तूदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होत नाही आणि घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे घर हेच सर्वस्व असते. त्याला घरात शांती, कुटुंबात आनंद आणि समाधान मिळते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे. तुमचे घर कसे असावे? ते कोणत्या दिशेने असावे? वास्तुशास्त्रात यासाठी अनेक नियम दिले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कधीही नसाव्यात कारण त्या तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. वास्तुशास्त्र काय म्हणते ते जाणून घेऊया.
कचरापेटी – वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचराकुंडी असू नये किंवा कचरा इकडे तिकडे पडून राहू नये. जर तुमच्या घरासमोर घाण असेल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करेल. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीत अडथळा आणते. यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
झाडे आणि वनस्पती – जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झाडे आणि झुडुपे असतील तर ते अशुभ मानले जाते, कारण ते तुमच्या प्रगतीत अडथळा मानले जातात. म्हणूनच वास्तुशास्त्र म्हणते की तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणतेही झाड किंवा वनस्पती असू नये.
चिखल – तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चिखल किंवा दलदल नसावी, कारण असे मानले जाते की यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
विजेचे खांब – वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घराच्या मुख्य दरवाज्यासमोर विजेचे खांब नसावेत. जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर विजेचे खांब असेल तर तुमच्या घरात भांडणे आणि वाद होतील.
पायऱ्या – जर घरासमोर पायऱ्या असतील तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जर तुमच्या घरासमोर पायऱ्या असतील तर त्या तुमच्या प्रगतीत आणि यशात अडथळा ठरतात, म्हणूनच असे म्हटले जाते की तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पायऱ्या असू नयेत.
