AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपाशी पोटी दूध प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या, अन्यथा शरीरावर…

दूध आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, उपाशी पोटी दूध पिणे हानिकारक ठरू शकते. आपल्यापैकी बरेचजण सकाळी चहा ऐवजी दूध पितात. नाश्त्याला वेळ मिळाला नाही की उपाशीपोटी दूध पितात. पण असे करणे म्हणजे आजरी पडण्यासारखे आहे. रिकाम्यापोटी दूध प्यायल्याने काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

उपाशी पोटी दूध प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या, अन्यथा शरीरावर...
Drinking Milk on an Empty Stomach,Benefits & Risks Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2025 | 4:14 PM
Share

लहान मूलं असू द्या किंवा मग मोठी माणसं दूध पिण्याचा सल्ला जवळपास सर्वांनाच दिला जातो. कारण त्यात असलेले कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी असंख्य पोषक घटक त्याला संपूर्ण आहार बनवतात. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात आहारात दूध पिणे हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणून अंमलात आणला जातो.

दूध हे शरीरासाठी जसं पौष्टीक असतं. तसंच ते नुकसानकारकही असतं.

काही महिला तर सकाळी मुलांना दूध आणि बिस्किटे पाजून शाळेत पाठवतात आणि काहीजण रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक ग्लास दूध पायला देतात. बहुतेक घरांमध्ये सकाळी नाश्त्यात लहान मुलांसाठी तर नेहमीच दूध असतंच असतं. तर काहीवेळेला काहीजण ऑफिसला जाण्याआधी चहा ऐवजी एक कप दूध घेऊन जातात. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की. दूध हे शरीरासाठी जसं पौष्टीक असतं. तसंच ते नुकसानकारकही असतं.

सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त हानिकारक

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा स्वत: देखील पौष्टीक म्हणून सकाळी उपाशी पोटी दूध पित असाल तर नक्कीच त्यामुळे पोटाचे आजारही होऊ शकतात. त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त हानिकारक ठरू शकतात. दुधात लैक्टोज नावाची साखर असते. त्यामुळे इन्सुलिन वाढू शकते. त्यामुळे उपाशी पोटी दूध पिले तर फायद्याऐवजी शरीरावर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.

रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात

> काही लोक ते पचवू शकत नाहीत आणि त्यांना लैक्टोज इंटोलेरेंट म्हणतात. जर असे लोक सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायले तर त्यांना त्वचेवर खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार इत्यादी ऍलर्जी होऊ शकते.

> रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पोटफुगी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवतात.

> दूध आम्लयुक्त असते, म्हणून सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काही लोकांमध्ये आम्लपित्त होऊ शकते. फॅटयुक्त दूधामुळे छातीत जळजळ आणि आम्लपित्त होऊ शकते.

> सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने इतर पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा येऊ शकतो. दुधात असलेले कॅल्शियम लोहासारख्या पोषक तत्वांचे शोषण रोखते. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

> सकाळी रिकाम्या पोटी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्ब्सने समृद्ध दूध प्यायल्याने पचन प्रक्रिया मंदावते.

> फुल फॅट दुधात भरपूर कॅलरीज असतात आणि सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने वजन लवकर वाढते.

> त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी दूध घेऊ नये. काहीतरी नाश्ता करून त्याच्या पाच ते दहा मिनीटांनी हे दूध प्यावे. किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध घणे कधीही उत्तम. पण तुम्हाला ही दूध न पचण्याचा त्रास असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.