AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध पेटलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. तसेच युद्ध लवकर शांत होईल अशी स्थिती दिसत नाही. त्यामुळे जगभरात इंधानाचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा स्थितीत आयपीएल 2026 स्पर्धेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यताImage Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 5:42 PM
Share

अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. या युद्धातून भारतही सुटलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे. यात इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे घरगुती आणि आवश्यक नसलेल्या क्षेत्रांसाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता भासू लागली आहे. याचा परिणाम आयपीएल 2026 स्पर्धेवरही होण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर स्पर्धेचं आयोजन करणं कठीण होईल. बीसीसीआय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनी सांगितलं की, या प्रकरणाकडे गांभार्याने पाहिले जात आहे. धुमल द न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, ‘आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. या युद्धात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सध्या काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. आयपीएल 2026 स्पर्धा पुढील काही दिवसात सुरू होणार आहे. त्यावेळची तीव्रता पाहून आम्ही निर्णय घेऊ.’

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल 2026 स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे.फ्रेंचायझींनी वेगवेगळ्या शहरात आधीपासून सराव शिबीर सुरू केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचं शिबीर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनेही सरावाला सुरूवात केली आहे. पण असं असूनही वेळापत्रक काही जाहीर केलेलं नाही. त्यात काही राज्यातील निवडणुकांमुळे आयपीएलचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच बाजूने बीसीसीआयला विचार करावा लागत आहे. अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्ध लांबलं तर आयपीएलबाबत विचार करणं भाग पडणार आहे. त्याचा प्रभाव फक्त लीगवरच नाही तर इतर उद्योग धंदे, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थावरही बसण्याची शक्यता आहे.

युद्धाचा सर्वाधिक परिणाम हा पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादनाच्या पुरवठ्यावर झाला आहे. बंगळुरु आणि चेन्नई येथील हॉटेल व्यावसायिक संघटनानी सांगितलं की, त्यांच्याकडे फक्त एक दोन दिवस पुरेल इतकाच साठा आहे. एलपीजीचा वापर मर्यादित करण्यासाठी हॉटेल्सने त्यांचा मेन्यू मर्यादित करण्यास सुरूवात केली आहे. इतकंच काय तर युद्धामुळे खेळाडूंना मायदेशी जाणंही कठीण असल्याचं दिसून आलं आहे. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. टी20 वर्ल्डकप संपल्यानंतरही झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका संघांना भारतातून तात्काळ निघता आलं नव्हतं.

Follow Us
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.