AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना किती गोड देणे योग्य? जाणून घ्या

मुलाने गृहपाठ पूर्ण केला तर त्याला आईस्क्रीम देणे, चांगले गुण मिळाले तर चॉकलेट देणे किंवा वाढदिवसाला मोठा केक आणणे, हे सर्व आपण करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, लहानपणी जास्त गोड खायला दिल्याने पुढे चालून मोठ्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात? चला, मुलांना 'शुगर स्मार्ट' कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.

लहान मुलांना किती गोड देणे योग्य? जाणून घ्या
sugar
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 4:29 PM
Share

मुलांना काहीतरी यश मिळाल्यावर त्यांना बक्षीस म्हणून मिठाई किंवा चॉकलेट देणे, हा आपल्या देशात एक सामान्य रिवाज आहे. होमवर्क पूर्ण झाल्यावर आईस्क्रीम, चांगले मार्क्स मिळाल्यावर चॉकलेट किंवा वाढदिवसाला मोठा केक आणणे, हे सर्व आपण प्रेमाने करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, लहानपणी जास्त गोड खायला दिल्याने पुढे चालून मोठ्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात? एका नवीन अभ्यासानुसार, जर मुलांना सुरुवातीपासूनच कमी साखर दिली गेली, तर त्यांना मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणाचा (Obesity) धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

लहानपणी जास्त गोड का टाळावे?

डॉक्टरांच्या मते, जास्त साखरेमुळे मुलांना पोटाच्या समस्या, ‘फॅटी लिव्हर’ (Fatty Liver) आणि ‘मूड स्विंग्ज’ (Mood Swings) यांसारख्या समस्या येऊ शकतात. ‘विश्व आरोग्य संघटना’ (WHO) नुसार, मुलांच्या एकूण कॅलरीजच्या फक्त ५% भाग साखरेतून यायला हवा. याचा अर्थ, एका दिवसात ४ ते ५ लहान चमच्यांपेक्षा जास्त साखर मुलांना देऊ नये. दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना तर अजिबात ‘ॲडेड शुगर’ देऊ नये. कारण लहान मुलांचे शरीर आणि त्यांची पचनसंस्था प्रक्रिया केलेली साखर पचवण्यासाठी तयार नसते, त्यामुळे या वयात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेल्या साखरेतील फरक

नैसर्गिक गोडवा हा दूध, फळे आणि भाज्यांमध्ये असतो, ज्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक तत्वेही असतात. ही साखर शरीरासाठी फायदेशीर असते आणि हळूहळू पचते. याउलट, प्रक्रिया केलेली किंवा ‘ॲडेड शुगर’ बिस्किटे, फ्लेवर्ड दही, सॉस, पॅक्ड ज्यूस यांसारख्या पदार्थांमध्ये असते. यात फक्त ‘रिकाम्या कॅलरीज’ असतात, ज्या शरीराला पोषण देत नाहीत. हीच साखर लठ्ठपणा, मधुमेह आणि दातांच्या समस्या वाढवण्याचे मुख्य कारण बनते.

मुलांना ‘शुगर स्मार्ट’ कसे बनवाल?

मुलांना गोड खाण्याची सवय लागू नये यासाठी दररोज गोड पदार्थ देणे टाळा. जर मुलाने एखाद्या दिवशी पार्टीत केक खाल्ला असेल, तर त्या दिवशी त्याला इतर कोणतीही गोड वस्तू देऊ नका. आईस्क्रीम, चॉकलेटसारख्या गोष्टी महिन्यातून २-३ वेळाच द्या. त्याऐवजी मुलांना फळे, सुका मेवा (ड्राई फ्रूट्स), मखाने, पीनट बटर किंवा घरी बनवलेले आरोग्यदायी स्नॅक्स खाण्याची सवय लावा. जेव्हा त्यांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा गूळ, खजूर यांसारखे आरोग्यदायी पर्याय द्या. अशा प्रकारे हळूहळू त्यांच्या चवीच्या सवयी बदलून त्यांना ‘शुगर स्मार्ट’ बनवता येते, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

बाजारतील आकर्षक पॅक आणि जाहिराती पाहून मुले अनेकदा गोड पदार्थांची मागणी करतात. अशा वेळी पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच आरोग्यदायी खाण्याची सवय लावावी. जर आपण आजपासूनच मुलांना ‘शुगर स्मार्ट’ बनवले, तर पुढे चालून ते केवळ आजारांपासून दूर राहणार नाहीत, तर अधिक सक्रिय आणि आनंदीही राहतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे