AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दही आणि दालचिनी मिक्स करून खा आणि झटपट वजन कमी करा!

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाली आहे. त्यामध्येही कोरोनामुळे आपण जास्त खाण्या-पिण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये आपण हेल्दी आहारापेक्षा जास्त कॅलरीयुक्त अन्न घेत आहोत.

दही आणि दालचिनी मिक्स करून खा आणि झटपट वजन कमी करा!
वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा खूप फायदेशीर आहे. मेथीचा चहा घरी तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मेथी घ्याव्या लागतील. त्यानंतर एक ग्लास पाण्यात मेथी उकळून घ्या आणि हे पाणी गाळून घेऊन प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 11, 2021 | 9:06 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाली आहे. त्यामध्येही कोरोनामुळे आपण जास्त खाण्या-पिण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये आपण हेल्दी आहारापेक्षा जास्त कॅलरीयुक्त अन्न घेत आहोत. यामुळे वजन वाढतच चालले आहे. वजन कमी करण्यासाठी आपण हेल्दी आहार घेतला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक स्पेशल खाद्य सांगणार आहोत. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Eat by mixing Curd and cinnamon and lose weight)

दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. मात्र, वजन कमी करण्यासाठी एक वाटी दह्यामध्ये चिमूटभर दालचिनी मिक्स करावी लागेल. अँटीऑक्सिडेंट्स आणि इतर पौष्टिक पदार्थांसह समृद्ध दालचिनी शरीरात साठवलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यामुळे आपले वाढलेले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

दालचिनी मिक्स दही आपण दररोज खाल्ल्ये पाहिजे. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

जेवणात दालचिनीचा उपयोग करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दालचिनी विविध अर्थाने गुणकारी आहे. त्यामुळे मसाल्यात आवर्जून दालचिनीचा वापर करायला हरकत नाही. दालचिनीचे आयुवैर्दिक गुणधर्म आहेत. त्यातील प्रमुख गुणधर्म म्हणजे दालचिनी खाण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते. त्यामुळे जेवण चवदार बनवण्याच्या हेतूनेच नव्हे तर एक आयुर्वेदिक उपाय म्हणून जेवणात दालचिनीचा वापर रोज केला पाहिजे. विविध आजार दूर करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Eat by mixing Curd and cinnamon and lose weight)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली