AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक अति प्रमाणात केस गळू लागलेत? तर शरीरात लपलेला असू शकतो ‘या’ गंभीर समस्या

अचानक आणि मोठ्या प्रमाणात केस गळणे ही केवळ एक सामान्य समस्या नाही, तर ते शरीरातील एखाद्या समस्येचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे त्याचे कारण ओळखून वेळेवर योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

अचानक अति प्रमाणात केस गळू लागलेत? तर शरीरात लपलेला असू  शकतो 'या' गंभीर समस्या
hair loss
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 8:09 AM
Share

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. दररोज 50 ते 100 केस गळणे सामान्य आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कारण हजारो केसांपैकी 50-60 केस गळणे ही चिंतेची बाब नाही. परंतु जेव्हा केस गळणे अचानक वाढू लागते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. काही लोकांना केसांमधून कंगवा फिरवताना केसांचा एक गुच्छा हातात येतो. पण बरेच लोकं याकडे केवळ हवामान, केसांची योग्य काळजी न घेणे किंवा तणावाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र हे कधीकधी एखाद्या गंभीर आजार असलेल्या समस्येचे लक्षण असू शकते, म्हणून मूळ कारण लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग शरीरातील कोणत्या समस्येमुळे अति प्रमाणात केस गळू लागतात ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

हे खरे आहे की निरोगी केसांसाठी चांगले आरोग्य, योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहेत. मात्र कधीकधी आपल्या शरीरात एखादा आजार बळावतो, ज्यामुळे केस गळण्यासोबतच अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवतो. ही वरवर किरकोळ वाटणारी लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात, ज्याकडे अनेक लोकं सहसा दुर्लक्ष करतात.

थायरॉईडच्या समस्या हे कारण असू शकते

आजकाल थायरॉईडच्या समस्या ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेकजण मग ते पुरुष असोत वा स्त्रिया, थायरॉईडच्या आजाराने त्रस्त असतात. थायरॉईड ही मानेच्या पुढच्या भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा तिच्या कार्यात बिघाड होतो, तेव्हा त्याचा परिणाम केसांवर होऊ शकतो. हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड या दोन्ही स्थितींमध्ये केस वेगाने गळू लागतात आणि कमकुवत होतात.

ॲलोपेशिया एरियाटा

ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करते, ज्यामुळे केस गळतात. या स्थितीमुळे स्कॅल्पवर टक्कल पडल्यासारखे दिसते. ॲलोपेशिया एरियाटामध्ये केस पूर्णपणे गळून पडतील की पुन्हा वाढतील हे निश्चितपणे ठरवणे अशक्य आहे. हे शरीरावर अवलंबून असते. कारण केस गळणे कधीही होऊ शकते किंवा एकदा वाढल्यानंतर ते पुन्हा वाढू शकतात.

ॲनिमिया (रक्ताची कमतरता)

ॲनिमिया ही समस्या विशेषतः लोहाची कमतरता असल्यावर निर्माण होते. मात्र ही समस्या केस गळण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाहीत. शिवाय जेव्हा लोहाची कमतरता असते, तेव्हा शरीर केसांचे पोषण करण्याऐवजी हृदय आणि यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्यासाठी लोहाचा वापर करते. यामुळे केसांच्या वाढीच्या चक्रात व्यत्यय येतो, ज्यामुळे केस वाढीचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच गळून पडतात आणि तुटतात. ही समस्या विशेषतः महिलांमध्ये सामान्यपणे आढळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.