AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार आश्चर्यकारक पदार्थ खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकतात. आयुर्वेदामध्ये अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात करता येऊ शकतो.

चार आश्चर्यकारक पदार्थ खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा
मधुमेहImage Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Nov 10, 2024 | 8:03 PM
Share

मधुमेह आता सामान्य आजार बनला आहे. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढले की मधुमेह होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढत आहे. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत .मधुमेहाचे दोन प्रकारे आहेत टाईप एक आणि टाईप दोन.

आहाराची आणि जीवनशैलीची अधिक काळजी मधुमेह असलेल्यांना घ्यावी लागते. थोडासा देखील निष्काळजीपणा मधुमेह असलेल्या लोकांना त्रासदायक ठरू शकतो.मधुमेह ही समस्या नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकतात. आयुर्वेदामध्ये अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात करता येऊ शकतो. येथे काही तज्ञांनी घरगुती उपाय सांगितले आहेत ज्याने मधुमेह नियंत्रणात करणे सहज शक्य होईल.

कडुलिंबाची पाने

कडूलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिक जिवाणूनाशक, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हे रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करतात. तुम्ही दहा ते बारा ताजी कडुलिंबाची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवून ते सकाळी रिकाम्या पोटी चघळले तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

बडीशेप

वेलची प्रमाणेच बडीशेप देखील एक सुगंधी मसाला आहे. हे तोंड स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते पण याचा वापर घरगुती उपायांमध्येही केला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात अंटीऑक्सीडेंट आणि फायबर असते. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. बडीशेप पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवून ते सकाळी चावून खाल्ल्यास किंवा त्याचे पाणी पिल्यास खूप फायदा होईल.

आवळा

आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट आढळतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. यासाठी रात्री आवळ्याचे दोन ते तीन तुकडे पाण्यात भिजवून ठेवून हे सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.