AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहींसाठी एक कप टोमॅटो रस अधिक फायदेशीर, जाणून घ्या सकारात्मक परिणाम

टोमॅटो ही एक भाजी आहे जी सहसा प्रत्येक घरात असते आणि भाजी म्हणून शिजवण्याव्यतिरिक्त, लोकांना त्याचे सॅलड खायला देखील आवडते. टोमॅटो केवळ चवीलाच चांगला नसतो, तर तो आहाराचा भाग ठेवल्याने अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. म्हणूनच, दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस पिल्याने तुम्हाला कोणते फायदे होतील हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

मधुमेहींसाठी एक कप टोमॅटो रस अधिक फायदेशीर, जाणून घ्या सकारात्मक परिणाम
Tomato JuiceImage Credit source: Instagram/ Channel 4 Health
| Edited By: | Updated on: Feb 27, 2025 | 1:18 AM
Share

बदलत्या वातावरणात आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी अनेकजण घरगुती उपाय करत असतात. कारण घरगुती उपायांचा शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. अशातच तुम्ही सुद्धा रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटो हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लाइकोपीन आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे,जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. या संदर्भात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हा टोमॅटोचा रस रिकाम्या पोटी सेवन केल्याने त्याचे शरीरात लवकर शोषले जाते आणि पचनसंस्थेवर, त्वचेवर आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळतेच शिवाय चयापचय सुधारण्यासही मदत होते.

त्याचवेळी डॉ. किरण गुप्ता म्हणाले की टोमॅटोचा रस हा त्वचेची चमक वाढवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहे. तसेच टोमॅटोचे रस पोटासाठी सुद्धा हलके असते आणि पचन सुधारते, त्यामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. याशिवाय, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढून वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार राहते. जर तुम्हाला तुमच्या आहारात काहीतरी सोपे आणि आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायचा असेल तर दररोज सकाळी टोमॅटोचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर..

डॉक्टर किरण गुप्ता सांगतात की, दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस पिणे मधुमेही रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. टोमॅटोमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI), फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

त्वचा चमकदार आणि तरुण बनवते

जर तुम्हाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असेल तर टोमॅटोचा रस पिण्यास सुरुवात करा. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि मुक्त रॅडिकल्सशी लढते. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकू लागते. टोमॅटोचा रस त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते.

हृदय निरोगी ठेवते

टोमॅटोचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो. कारण यातील असलेले पोटॅशियम आणि लायकोपीन घटक हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

शरीराला डिटॉक्सिफाय करते

टोमॅटोचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीर अधिक निरोगी आणि सक्रिय राहते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स किडनी आणि लिव्हर यांचे आरोग्य निरोगी ठेवतात आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. यामुळे शरीर ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटते.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस प्यायल्याने आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यासारखे किरकोळ आजार सहज होत नाहीत. जर तुम्ही लवकर आजारी पडत असाल तर तुमच्या आहारात हे नक्की समाविष्ट करा.

तुम्हाला जर तुमचे आरोग्य सुदृढ करायचे असल्यास दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस पिण्यास सुरुवात करा. यामुळे तुमचे शरीर निरोगी तर राहीलच, पण तुमची त्वचाही चमकेल आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. मात्र तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही कोणताही उपचार घेत असाल तर काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार