AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोमट पाणी आरोग्यासाठी फायदेशीर; पण ‘या’ लोकांसाठी ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या का ?

कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी प्रत्येकासाठी ते सुरक्षित नसते! काही लोकांसाठी गरम पाणी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. हृदयविकार, कमी ब्लडप्रेशर किंवा प्रेग्नेंसीमध्ये ते त्रासदायक ठरू शकते. कोण कोण टाळावं गरम पाणी? जाणून घ्या सविस्तर

कोमट पाणी आरोग्यासाठी फायदेशीर; पण ‘या’ लोकांसाठी ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या का ?
कोमट पाणी
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 4:10 PM
Share

कोमट पाणी पिणे अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. ते पचनक्रिया सुधारण्यास, वजन कमी करण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. पण प्रत्येकासाठी ते फायदेशीर नाही. काही लोकांसाठी कोमट पाणी नुकसानकारक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी कोमट पाणी टाळावे !

1. हार्ट पेशंट : कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाची समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तदाब असंतुलन होऊ शकते. परिणामी, चक्कर येणे, थकवा किंवा अस्वस्थता होऊ शकते.

2. कमी ब्लडप्रेशर असलेली लोकं : लो ब्लडप्रेशर असलेल्या लोकांसाठी कोमट पाणी हानिकारक ठरू शकते. ते शरीराच्या रक्तदाबाला आणखी कमी करू शकते.

3. डीहाइड्रेशन किंवा अशक्तपणा असलेली लोकं : गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे जास्त घाम येतो. परिणामी, डिहायड्रेशन वाढू शकते. अशा लोकांसाठी सामान्य तापमानातील पाणी अधिक योग्य आहे.

4. जास्त ताप किंवा इन्फेक्शन असलेली लोकं : ताप असलेल्या लोकांसाठी कोमट पाणी हानिकारक ठरू शकते. हे शरीराची उष्णता वाढवू शकते, ज्यामुळे ताप अधिक वाढू शकतो.

5. प्रेग्नेंट बायका : प्रेग्नेंट महिलांनी कोमट पाणी टाळले पाहिजे, विशेषत: गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या महिन्यांत. गरम पाणी शरीरातील उष्णता वाढवू शकते, ज्यामुळे गर्भाशयात असलेल्या बाळाला धोका होऊ शकतो.

6.उन्हाळ्यात : बाहेरील वातावरण खूप गरम असले तरी कोमट पाणी पिण्यामुळे शरीर अधिक तापू शकते, ज्यामुळे हिट स्ट्रोक किंवा डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.

उन्हाळ्यात पाणी पिण्याचे सोपे आणि आरोग्यदायी नियम :

1. एकदम खूप सगळं पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं थोडं करत पाणी प्यायल्यास शरीराला पुरेशी हायड्रेशन मिळते.

2. अतिशय थंड पाणी पिल्याने घशाला त्रास होऊ शकतो, तसेच अचानक शरीरात तापमान बदल झाल्यास पचनावर वाईट परिणाम होतो.

3. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील उष्णता बाहेर जाते, अशावेळी साधं किंवा किंचित कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील तापमान बॅलन्स राहतं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.